नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा व तळोदा तालुक्यात गेल्या दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही गावांमध्ये पाणी शिरले असून जनसंपर्क तुटला आहे.
अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हाहाकार माजवल्याने जनजीवन वस्किळीत झाले आहे. दरम्यान बुधवारी सकाळी पावसाचे संततधार सुरू असल्याने भवर नदी, खर्डी नदीचा दुसरा पुरा वरून पाणी वाहत आहे.
तर सोरापाडा या गावातून पाणी वाहू लागले. यासह अक्कलकुव्यातील सिंगपुर बुद्रुक गावाचा पुलावरून पाणी वाहू लागले आहे. तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील दोन गावातील घर पाण्याखाली गेली आहेत. सोरापाडा अलीविहीर, मौलीपाडा, इच्छागव्हाण, सिंगपूर शर्विे या गावातील संपर्क तुटला आहे








