नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी पोट निवडणुक प्रक्रिया घेण्यात येत आहे. काल अखेपर्यत जिल्हा परिषदसाठी १३२ तर पंचायत समितीसाठी ८२ इच्छुक रंगणात आहेत. उद्या दि.२७ रोजी माघारीची अंतिम मुदत असून राजकीय नेत्यांकडून इच्छकांच्या माघारीसाठी मनधरणी करण्यात येत आहे. उद्या माघारीनंतर सायंकाळपर्यंत रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.असे असले तरी प्रचाराचा धुराळाचा उडणार आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत ११ जि.प. गट व १४ पं.स.गणातील सदस्यांच सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. सदर सदस्यांच्या निवडीसाठी सुरवातीला पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर छाननीअंती आहे. त्यास्थितीत निवडणुक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्यावेळी जिल्ह्यातील ११ जि.प. गटांसाठी १३२ तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी ८२ नामांकन वैध ठरली होती. छाननीअंती अक्कलकुवा गटात तर कोराई गणात एक नामाकंन अवैध ठरले होते. उर्वरीत सर्व नामांकन वैध ठरविण्यात आले होते. त्यानंतर दि.१३ सप्टेंबर रोजी राज्य निवडण्ुक आयोगाने निवडण्ुका घेण्यास हिरवा कंदील दिला होता. त्यानुसार पोटनिवडणक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
उद्या दि.२७ सप्टेंबर रोजी माघारीची अंतिम मुदत आहे. अद्यापावेतो इच्छुकांमधुन कोणीही माघार घेतली नसल्याने राजकीय पदाधिकारी व नेत्यांकडून इच्छुकांची माघारीसाठी मनधरणी करण्यात येत आहे. काही गट व गणांमध्ये राजकीय नेत्यांचे कुटूंबिय निवडणुक लढवित असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे पोटनिवडणुक प्रक्रिया घेण्यास निवडणुक आयोगाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर ज्या त्या गट व गणांमध्ये प्रचाराला सुरूवात झाली आहे. होम टू होम प्रचारावर इच्छुकांकडून भर देण्यात येत आहे. काही इच्छुक अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम असल्याने त्यांच्याकडून प्रचाराला जोर देण्यात आला आहे. उद्या दि.२७ सप्टेंबर रोजी माघारीनंतर रिंगणातील खर्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यातच राजकीय नेते नेमके इच्छुकांच्या माघारी घेण्यात कितपत यशस्वी होतात. हे देखील उद्याचा समजणार आहे. जल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी पोट निवडणुकीसाठी दि.५ ऑक्टोंबर रोजी मतदान तर दि.६ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.