Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारत बंदला प्रहार शेतकरी संघटनेचा पाठींबा शेतकरी, व्यापारी, नागरीकांनी बंद यशस्वी करावा प्रहार शेतकरी संघटनेचे आवाहन

Mahesh Patil by Mahesh Patil
September 24, 2021
in Uncategorized
0

नंदुरबार l प्रतिनिधी

-दि.२७ सप्टेंबर २०२१ सोमवार रोजी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे विरोधात तसेच देशात भरमसाठ वाढलेल्या महागाई विरोधात संयुक्त किसान मोर्चा व देशभरातील शेतकरी संघटनांनी बंद पुकारला असून या बंदला नंदुरबार जिल्हा प्रहार शेतकरी संघटनेचा पूर्णपणे पाठींबा असून या भारत बंद यशस्वी करण्यासाठी तमाम शेतकरी, व्यापारी बांधव व इतर नागरीकांनी एकजुटीचे दर्शन घडवून बंद यशस्वी करावा, असे आवाहन हार शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष बिपीन चंद्रकांत पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
दि.२७ सप्टेंबर २०२१ सोमवार रोजी शेतकर्‍यांवर लादलेल्या तीन कृषि कायदे केंद्र सरकारने रद् करावेत, तसेच शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाचा दिडपट हमीभाव मिळावा, खाजगीकरणाची निती बंद करावी, पेट्रोल, डिझेल, गॅस इत्यादींच्या किंमती कमी करुन नागरीकांना दिलासा द्यावा, तसेच केंद्र सरकार आणणार असणारे वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्यावेत, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत कामाचे दिवस वाढवून शेत मंजुरांचे रोजगार हमीचे वेतन दुप्पट करावे. राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकर्‍यांना पीककर्ज देण्यासाठी शेतकर्‍यांच्या सीबी स्कोअर तसेच ज्या शेतकर्‍यांनी ओटीएस योजनेत बँकेचे कर्ज भरले आहे, त्या शेतकर्‍यांना त्वरीत कर्ज मंजुर करावे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना आर्थिक मदत तसेच पिकविमाधारक शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम परत मिळावी. कामगार विरोधी कायदे मागे घ्यावी, यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी बंद पुकारला असून प्रहार शेतकरी संघटना नंदुरबार जिल्ह्याचा बंदला पूर्णपणे पाठींबा असून या भारत बंद यशस्वी करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने तमाम शेतकरी, व्यापारी बांधव व इतर नागरीकांना भरमसाठ वाढलेल्या महागाई विरोधात एकजुटीचे दर्शन घडवून बंद यशस्वी करावा, असे आवाहन प्रहार शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष बिपीन चंद्रकांत पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचा सत्कार

Next Post

राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार: मुख्यमंत्र्यांची सम्मती

Next Post

राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार: मुख्यमंत्र्यांची सम्मती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावधान : गोमाई नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

सावधान : गोमाई नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

September 24, 2023
पर्यटनस्थळाची श्रमदानातून स्वच्छता , गट विकास अधिकारी यांच्या हस्ते गौरव

पर्यटनस्थळाची श्रमदानातून स्वच्छता , गट विकास अधिकारी यांच्या हस्ते गौरव

September 24, 2023
औरंगाबाद खंडपीठाचे पत्नी व मुलांना वाढीव पोटगी देण्याचे आदेश

औरंगाबाद खंडपीठाचे पत्नी व मुलांना वाढीव पोटगी देण्याचे आदेश

September 24, 2023
सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विधी महाविद्यालयातर्फे सत्कार

सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विधी महाविद्यालयातर्फे सत्कार

September 24, 2023
राम रहीम उत्सव समिती तर्फे गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत सहभागी मंडळ पदाधिकाऱ्यांच्या उद्या सत्कार

विविध रस्त्यांचे कामे त्वरित सुरू करा, मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे मागणी

September 24, 2023
नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी आदिवासी भागात सेवा द्यावी : डॉ. विजयकुमार गावित

नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी आदिवासी भागात सेवा द्यावी : डॉ. विजयकुमार गावित

September 24, 2023

Total Views

  • 3,588,274 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group