नंदुरबार | प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यासह आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास तुफानी वारा व विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपले. दरम्यान नंदूरबार तालुक्यातील आष्टे परीसरासह धुळे -नंदुरबार सिमावर्ती भागात सुमारे २० मिनीटे गारपीट झाली.त्यामुळे शेतकर्यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या आठ दिवसांपुर्वी साक्री तालुक्यातील छडवेल परीसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली.होती.त्यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील १५०० हेक्टरवर असलेल्या पीकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले होते.त्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण होत नाहीत तेवढ्यात १३ मार्च रोजी पुन्हा अवकाळी पावसाने पुन्हा धुमाकुळ घातल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते.
आज पुन्हा दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास तुफानी वारा व विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात झोडपले.दरम्यान धुळे -नंदुरबार सिमावर्ती भाग असलेल्या नंदुरबार तालुक्यातील हरिपूर, अजयपुर, ठाणेपाडा, आष्टे, केवडीपाडा, वाघाडे, सोनगीरपाडा यासह विविध गावात सुमारे २० मिनीटे गारपीट झाली.यात परिसरातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर गहु,हरभरा, मका,सोयाबीन,कांद्यासह विवीध पीकांचे नुकसान झाले आहे.राज्य कर्मचार्यांचा संप केव्हा मिटेल व शेतकर्यांच्या नुकसान झालेल्या पीकांचे केव्हा पंचनाम होईल या चिंतेत शेतकरी वर्ग दिसुन येत आहे.