Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शौचालयाला उघड्यावर जाणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करून त्याची कडक अंमलबजावणी करावी : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

team by team
September 13, 2021
in आरोग्य
0
शौचालयाला उघड्यावर जाणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करून त्याची कडक अंमलबजावणी करावी : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे
नंदुरबार l प्रतिनिधी
स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध आहे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी वैयक्तिक व परिसर स्वच्छता महत्त्वाचे आहे .जिल्ह्यात अनेक गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालयांची उभारणी करण्यात आली परंतु ग्रामस्थांकडून त्यांचा नियमित वापर होत नसल्याने गावाबाहेर दुर्गंधी दिसून येते. परिसर स्वच्छ राहण्यासाठी गावातील सरपंच, ग्रामसेवक ,लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन शौचालय वापराबाबत ग्रामस्थांना सक्ती करावी .शौचालयाला उघड्यावर जाणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करून त्याची कडक अंमलबजावणी करावी अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना यांनी केले आहे.
              भारत पुढील वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी राज्य शासनातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हा हागणदारी मुक्त अधिक घोषित  करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून त्यानुसार जिल्हा स्तरावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पावस्व) डॉ. वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत  स्वच्छतेसाठी विविध उपक्रम सुरू आहे आहेत.
            जिल्हा हागणदारी मुक्त अधिक घोषित करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर 100 टक्के शौचालयाचा वापर होणे आवश्यक आहे. तसेच शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय किंवा शासकीय कार्यालयांमध्ये शौचालय उपलब्धता व त्याचा नियमित वापर आवश्यक आहे. गावस्तरावर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आवश्यक आहे.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण )अंतर्गत जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये शौचालयांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. तसेच ज्या कुटुंबांकडे शौचालय उपलब्ध नाही त्यांनाही भविष्यात शौचालय उपलब्ध करून देण्याचे शासनाचे नियोजन आहे .मात्र ज्या कुटुंबधारकांकडे शौचालय उपलब्ध असूनही त्यांचा वापर होताना दिसून येत नाही, शौचालयाच्या 100 टक्के वापर केल्यास गावाबाहेर दिसणारीरे दुर्गंधी कमी होईल .तसेच  उघड्यावरील हागणदारी बंद झालेस पावसाळ्यात पाणीपुरवठा योजनेच्या जलस्रोताभोवती हागनदारी मुळे साचलेले दूषित पाणी कमी होऊन साथ रोगांना अटकाव होवून  ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.परिसर गाव व परिसर स्वच्छ राहण्यासाठी गावातील सरपंच, ग्रामसेवक ,लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन शौचालय वापराबाबत ग्रामस्थांना सक्ती करावी .शौचालयाला उघड्यावर जाणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करून त्याची कडक अंमलबजावणी करावी असे आवाहनही रघुनाथ गावडे यांनी केले आहे
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात गाव परिसराची स्वच्छता कायम राहावे यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे गाव कृती आराखडा तयार करण्याची कामे सुरू आहेत. याबाबत सामाजिक संस्था व तालुकास्तरावरील गट संसाधन  केंद्राचे कर्मचारी यांचेमार्फत सर्वेक्षण सुरू आहे .या सर्वेक्षण वेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून गाव कृती आराखड्यात सांडपाणी व घनकचरा  यांचे योग्य रीतीने नियोजन होण्यासाठी सहकार्य करावे जेणेकरून गावस्तरावर भविष्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी तयार होणारे  उपांगे ही उत्तम दर्जाचे व कायमस्वरूपी टिकाऊ राहतील. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन ही मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांना केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

विद्यार्थीना एस.टी पास त्वरित द्या जितेंद्र पावरा यांची मागणी

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add