नवापूर l प्रतिनिधी
मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अधिक महत्त्व आहे आणि म्हणूनच नवापूर येथील स्वामीनारायण सत्संग मंडळातर्फे दर वर्षा प्रमाणे झोळीपर्व दानपर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले व लोकांनी दिलेले दान स्वीकारण्यात आले.
वेद उपनिषद भागवत वचनामृत ग्रंथांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अधिक महत्त्व सांगितले आहे.आपसातील कटूता विसरून तिळगुळच्या आदान प्रदा नातून मनामनात स्नेहभाव निर्माण करणारा अत्यंत शुभ दिन म्हणून मकर संक्रांतीला दान करण्याला विश्वभरात महिमा आहे. त्यानुसार बीएपीएस स्वामीनारायण संस्था संचलित नवापूर स्वामीनारायण मंडळातर्फे झोळीपर्व दान स्वीकारण्यात आले.येथील नागरिकांनी या दान पर्वाला मोठा प्रतिसाद दिला.या मिळालेल्या सर्व दानाचे उपयोग उकई येथील स्वामीनारायण छात्रालयातील विद्यार्थ्यांसाठी केला जातो.
पूज्य प्रमुखस्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने व पूज्य महंतस्वामी महाराज यांच्या प्रेरणेने भारतासह विविध देशात मकर संक्रांतीला झोळीपर्व दान स्वीकारण्यात आले झोळी पर्वाच्या दान स्वीकारण्यासाठी निघालेल्या फेरीत उकाई मंदिराचे साधक कुणालभाई अहिर,क्षेत्र निरीक्षक प्रा. राजेन्द्र पाठक कमलेशभाई अग्रवाल,संजयभाई अग्रवाल,भटूभाई जाधव जितुभाई सोनार,किशोरभाई प्रजापत,महेंद्र जाधव,प्रा.कमलेश पाटील,जितेंद्र अग्रवाल,डॉ.नरेंद्र पाटील,कांतु प्रजापत,प्रफुल प्रजापत,राकेश प्रजापत,संदीप सोनवणे,पियुष प्रजापत,किशोर प्रजापत,विपुल प्रजापत योगेश सोनार यांच्यासह मंडळाचे सत्संगी बांधव सहभागी झाले होते.
या दान फेरीची सांगता छगनभाई प्रजापत यांच्या निवस्थानी झाली.मंडळ संचालक प्रा. राजेंद्र पाठक यांनी या दान फेरीच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने प्रयत्न केलेत त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानलेत









