Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

वनविभागाने केलेल्या कारवाईचा निषेध करत आदिवासी टायगर सेनेतर्फे धडगाव व शहादा वनविभागाला दिले निवेदन

Mahesh Patil by Mahesh Patil
September 3, 2021
in राजकीय
0
वनविभागाने केलेल्या कारवाईचा निषेध करत आदिवासी टायगर सेनेतर्फे धडगाव व शहादा वनविभागाला दिले निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी
वनविभागाने केलेल्या कारवाईचा निषेध करत आदिवासी टायगर सेनेतर्फे धडगाव व शहादा वनविभागाला निवेदन देण्यात आले.
वनविभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
वनविभागाने केलेल्या कारवाईचा आदिवासी टायगर सेनेतर्फे निषेध नोंदवत आहोत. जल,जंगल,जमीन हे आमच्या आदिवासी समाजाच्या मालकीचे असून त्यावर रोजगार अवलंबून असणाऱ्या गरीब आदिवासी वर आपण धडक कारवाई करून शेखी मिरवत आहात त्याचे आमच्या तर्फे जाहीर अभिंनदन. प्रत्यक्षात 24 लाकडी खाट जप्त केल्या होत्या प्रत्यक्ष दर्शीनी त्या पाहिल्या होत्या तसेच वर्तमानपत्र मध्ये सुद्धा 24 खाटांचा उल्लेख आहे पण पंचनामा झाला 22 खाटांचा झाला मग या दोन खाटा गेल्या कुठे ? असा प्रश्न पडला आहे या दोन खाटा कोणाला बक्षीस देण्यात आल्या. या बाबतीत आम्हाला रीतसर माहिती आपणाकडून अपेक्षित आहे.
तसेच वनविभाग आमच्या सातपुड्यात भारत स्वतंत्र झाल्यापासून कार्यरत आहे तरी सुद्धा आजच्या घडीला जवळपास 90 टक्के डोंगर हे उघडे – नागडे झालेले आहे. त्याला जे दोषी अधिकारी असतील त्यावर कधी आपण अशी धडक कारवाई केली नाही कधी करणार आहात ? आम्हाला माहिती मिळणे अपेक्षित आहे .जे काही जंगल वाचलेले आहेत ते आमच्या आदिवासींनी वाचवले आहेत तरीसुद्धा आपला वनविभाग आमच्या गरीब आदिवासीवर धडक कारवाई करतो. जे काही डोंगर उघडे नागडे झालेले आहेत त्याची लाकूड तोड सर्रास पणे करून मोठ्या शहरामध्ये विकले गेले तेव्हा का नाही झाली अशी धडक कारवाई ! वनविभाग समोर डोगर उघडे आहेत याला जबाबदार कोण ? आपण दरवर्षी कित्येक योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च केले तरी सुद्धा सातपुड्यातील डोंगर उघडे नागडे राहतात मग जातो कुठे? तसेच आपला कर्मचारी जंगल वाचवायला सातपुड्यात कधीतरी येतात नियमानुसार येथे राहणे असताना ते कर्मचारी राहत नाहीत असे दिसून येते . आपल्या विभाग मार्फत अर्थात काकडदा, बिलगाव आणि अक्राणी बिटात मागील १० वर्षात ज्या विविध जंगल संवर्धनाची कामे करण्यात आल आहे त्या कामांची यादी मिळावी. तसेच वनविभाग मार्फत रोजगार निर्मितीसाठी मनरेगा विभाग चालविण्यात येतो ,हा संशोधनाचा विषय आहे की आजपर्यंत किती लोकांना खरच रोजगार मिळाला आहे.वनविभाग मार्फत मनरेगा मधून गेल्या १० वर्षात राबविण्यात आलेल्या संपूर्ण माहिती आम्हास अभ्यास करण्यास मिळावी जेणेकरून धडक रोजगार निर्मिती कागदावर झाली का प्रत्यक्षात झाली हे निदर्शनास येईल.अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आदिवासी टायगर सेनेचे धडगाव तालुका अध्यक्ष संदीप पावरा यांची स्वाक्षरी आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

लघुसिंचन योजनेच्या सहाव्या प्रगणनेचे काम वेळेत पूर्ण करा- मनीषा खत्री

Next Post

राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघ नंदुरबार जिल्हातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

Next Post
राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघ नंदुरबार जिल्हातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघ नंदुरबार जिल्हातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एस.ए.मिशन येथे १२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

एस.ए.मिशन येथे १२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

June 25, 2022
नवापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

नवापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

June 25, 2022
बिलाडी त.सा गावातील घरकुल यादी मध्ये मोठा भ्रष्टाचार ; ग्रामस्थांचा उपोषणाचा ईशारा

बिलाडी त.सा गावातील घरकुल यादी मध्ये मोठा भ्रष्टाचार ; ग्रामस्थांचा उपोषणाचा ईशारा

June 25, 2022
राज्य संस्थाचालक महामंडळावर राजेंद्र कृष्णराव गावित यांनी निवड, भास्करराव पाटील यांनी केला सपत्नीक सत्कार

राज्य संस्थाचालक महामंडळावर राजेंद्र कृष्णराव गावित यांनी निवड, भास्करराव पाटील यांनी केला सपत्नीक सत्कार

June 25, 2022
नागरिकांना नदीतून पुराच्या पाण्यात करावा लागतोय जीवघेणा प्रवास

नागरिकांना नदीतून पुराच्या पाण्यात करावा लागतोय जीवघेणा प्रवास

June 24, 2022
जिल्ह्यात नव्याने बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती गठीत

जिल्ह्यात नव्याने बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती गठीत

June 24, 2022

एकूण वाचक

  • 1,659,306 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group