Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोरोना संकटकाळात अडीच लाख शिवभोजन थाळ्यांचे निःशुल्क वाटप

Mahesh Patil by Mahesh Patil
August 25, 2021
in राज्य
0
कोरोना संकटकाळात अडीच लाख शिवभोजन थाळ्यांचे निःशुल्क वाटप
नंदुरबार l प्रतिनिधी
‘ब्रेक द चेन’ च्या प्रक्रीयेंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर गरीब व गरजू नागरिकांना दि.15 एप्रिल 2021 पासून शिवभोजन थाळी  नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येत असून आतापर्यंत 2 लाख 55 हजार 613 थाळ्या नि:शुल्क देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. अशावेळी शासनाने गरजू नागरिकांना एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा कालावधी वेळोवेळी वाढविण्यात आला आहे.
अक्कलकुवा तालुक्यात आतापर्यंत 27 हजार 751, अक्राणी 31 हजार 282, नंदुरबार 88 हजार 775, नवापूर 36 हजार 321, शहादा 34 हजार 626 आणि तळोदा तालुक्यात 36 हजार 858 थाळ्या नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोना कालावधीत प्रत्येक केंद्राच्या इष्टांकातही दीडपट वाढ केल्याने जिल्ह्यातील 16 शिवभोजन केंद्रांवरून दररोज 2550 थाळ्या वितरीत होत आहेत.
राज्य शासनाने गरीब आणि गरजू व्यक्तींना अल्पदरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी 26 जानेवारी 2020  पासून केवळ दहा रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नंतर थाळीचे शुल्क 5 रुपयापर्यंत कमी करण्यात आले. दुसऱ्या लाटेच्यावेळी कडक निर्बंध असल्याने 15 एप्रिलपासून ही थाळी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे गरजूंना भोजनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
योजनेच्या प्रारंभापासून आतापर्यंत एकूण 7 लाख 86 हजार 673 थाळ्यांचे वितरण करण्यात आले असून त्यापैकी 2 लाख 55 हजार 613 थाळ्या नि:शुल्क, 5 लाख 14 हजार 412 थाळ्या 5 रुपये शुल्क आकारून आणि 16 हजार 648 थाळ्या दहा रुपये शुल्क आकारून वितरीत करण्यात आल्या आहेत.
योजनेंतर्गत 26 जानेवारी 2020 पासून अक्कलकुवा  तालुक्यात 90 हजार 263, अक्राणी 96 हजार 455, नंदुरबार 2 लाख 62 हजार 93, नवापूर 1 लाख 6 हजार 250, शहादा 1 लाख 13 हजार 986 आणि तळोदा तालुक्यात 1 लाख 17 हजार 626 थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. एकूणच शिवभोजन थाळी संकटकाळात गरजू व्यक्तींना दिलासा देणारी ठरली आहे. आता 14 सप्टेंबर 2021 पर्यंत जिल्ह्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्रांवर ही थाळी मोफत देण्यात येणार आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

पत्रकार रणजित राजपूत यांना समाज भूषण पुरस्काराने केले सन्मानित

Next Post

मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

June 21, 2025
जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

June 21, 2025
मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

June 21, 2025
तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

June 17, 2025
जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

June 17, 2025
राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

June 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group