किटनाशकांची हाताळणी, किटनाशकामुळे विषबाधा होऊ नये यासाठी शेतकर्यांनी घ्यावयाची दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना आदी विविध बाबींसंदर्भात शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषि विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चित्ररथाचा शुभारंभाच्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी प्रदीप लाटे, मोहिम अधिकारी एम.जी.विसपुते, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक एन.डी.पाडवी, कृषि अधिकारी वाय.एस.हिवराळे, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.
मोहिमेअंतर्गत किटनाशकांची हाताळणी, किटनाशकामुळे विषबाधा होऊ नये यासाठी शेतकर्यांनी घ्यावयाची दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना आदी विविध बाबींसंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.
शेतकर्यांना सुरक्षा कीटचे महत्व समजावून सांगितले जाणार आहे. मोहिमेअंतर्गत ८ किटकनाशक उत्पादक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी अदामा इंडिया प्रा.लि. कंपनीस नोडल कंपनी नेमण्यात आले आहे.
श्री.महेश शांताराम पाटील
9404747458
At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458