Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वसतीगृहांमध्ये डीबीटी पध्दत बंद करुन जुनी मेसची भोजना व्यवस्था सुरु करावी , अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेची मागणी

team by team
August 29, 2022
in राज्य
0
वसतीगृहांमध्ये डीबीटी पध्दत बंद करुन जुनी मेसची भोजना व्यवस्था सुरु करावी , अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेची मागणी

नंदुरबार  l

 

आदिवासी विकास विभागामार्फत सुरु असलेली डीबीटी पध्दत बंद करुन आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहातच भोजना व्यवस्था म्हणजे जुनी मेस पध्दत सुरु करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुनसिंग वसावे यांनी केली आहे.

याबाबत राज्यपाल, मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, आयुक्त, अप्पर आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात शासकिय आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना दिले जाणारे भोजन पध्दतीत बदल करुन डी.बी.टी. अंतर्गत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर भोजनाचे पैसे जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने घेतल्यामुळे सदर निर्णय हा वसतीगृहातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसानाबरोबर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम करणार आहे.

 

 

त्यामुळे डीबीटी पध्दतचा निर्णय रद्द करुन जुनी मेस पध्दतीने भोजना व्यवस्था सुरु करावी. महाराष्ट्र शासनाने 12 जानेवारी 2017 ला महाराष्ट्र आधार (वित्तीय आणि इतर अर्थसहाय्य, लाभ व सेवा यांचे लक्षित वितरण) अधिनियम 2016 पारीत केला आहे. या कायद्यानुसार शासनाने नियम आणि वस्तू व योजना यांना नोटिफाय करुन ऊइढ योजना लागू करणे आवश्यक होते. तसेच त्यास जनाधार मिळाला असता अभ्यास गट समिती स्थापन करुन वेळेच अपव्यय केला गेला व आदिवासी मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागले. सदरीची डीबीटी योजना समाजकल्याण विभागाला लागु केलेली नाही.

 

म्हणुन आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वस्तीगृहांना देखील डीबीटीची योजना लागु करण्यात येवु नये. वसतीगृहांमध्ये जुनी मेस पध्दत सुरु करुन भोजन पुरवठा पुर्ववत सुरु करावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुनसिंग वसावे यांनी निवेदनातून केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

Next Post

महिलांचे हक्क व सुरक्षेसाठी कायदा भक्कम- न्या मलशेट्टी

Next Post
महिलांचे हक्क व सुरक्षेसाठी कायदा भक्कम- न्या मलशेट्टी

महिलांचे हक्क व सुरक्षेसाठी कायदा भक्कम- न्या मलशेट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add