नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील टोकरतलाव गावाच्या मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव गावाच्या मुख्य चौकात निकुल प्रताप वसावा, महेश प्रताप वसावा, अजय रामदास वसावा, प्रकाश तिलसिंग वसावा सर्व रा.सामरपाडा ता.नेत्रंग व रघुवीर अर्जुन वसावा रा.महुपाडा ता.सागबारा नर्मदा यांनी सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रास होईल याची जाणीव असतांना वाद्य वाजविले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचेही उल्लंघन केले.
याबाबत पोहेकॉ.पंकज बिरारे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुरेश वसावे करीत आहेत.








