नंदूरबार l प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच अध्यक्ष ईश्वर संतोष माळी यांच्या स्वखर्चातून जयनगर ते उभादगड रस्त्यालगत अमरधाम परिसरात खूप अंधार असल्याकारणाने विजेचा पोलवरती तार टाकले व लाईट बसवण्यात आले.
जयनगर येथे ग्रामपंचायत ते अमरधाम हे अंतर अंदाजे पाचशे मीटर असून रस्त्यावर लाईटची व्यवस्था नव्हती. रात्री अपरात्री पायी शेतात जाणारे व एखाद वेळेस रात्री प्रेतयात्रेला जाणारे लोकांना अंधारातून जावे लागत होते.
म्हणून लोकांची गैरसोय होत होती. त्यामुळे युवा मंचचे अध्यक्ष यांनी स्वखर्चातून सदर रस्त्यावर लाईटची व्यवस्था केली असल्याने ग्रामस्थांची सोय होण्यास मदत झाली आहे .
यासाठी माजी उपसरपंच किशोर दंगल माळी, अनिल पाटील, प्रकाश करंजे, सुनील माळी ,मोहन पारधी, चुनीलाल पाटील, लाला गोसावी, कुणाल माळी, चिंतामण गोसावी ,प्रशांत गोसावी ,राहुल माळी, गणेश माळी, कपिल चित्ते, बुद्धर भील, राहुल सोनवणे, विनोद मोरे सिद्धांत सोनवणे यांचे सहकार्य लाभले तसेच निलेश शुक्ल, अनिल पारधी व वैभव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.








