नवापूर l प्रतिनिधी
अखिल भारतीय व्यवसाय संगणक प्रणालीद्वारे (सन २०२२) होणाऱ्या परिक्षेचे केंद्र नवापूर आय. टी. आय. येथे देण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थीनींकडून करण्यात आली असून याबाबतचे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत यांना देण्यात आले असून सदरचे निवेदन खा. डॉ. हीना गावीत यांना पाठविण्यात येणार आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, नवापूर येथे शिकणारे सुमारे ८० टक्के प्रशिक्षणार्थी हे आदिवासी समाजातील आहेत. पर्यायाने आर्थिक परिस्थीती हालाकीची आहे. दरम्यान, नवापूर येथील केंद्रावर यापूर्वीदेखील ऑनलाईन प्रणालीद्वारे परीक्षा झाली होती. परंतु मागील परीक्षा हि जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे व धुळे जिल्हातील दोंडाईचा येथे घेण्यात आली.
नवापूर येथून १०० ते १२५ कि.मी. पोहचणे नवापूर येथील विद्यार्थ्यांना जिकरीचे जाते. तसेच तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देखील दोन वेळा झाल्याने काही प्रशिक्षणार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. संपूर्ण प्रक्रियेत महिला प्राशिक्षणार्थीचे हाल झाले आहेत. आर्थिक व मानसिक कुचंबना होऊन शैक्षणिक नुकसान झाले.
यामुळे सदरची परीक्षा नवापूर येथील आय. टी. आय. केंद्रावर घेण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी विद्यार्थी मनेश गावीत, जय घिरे, अमोल गावीत, सोमनाथ पवार, विशाल चौधरी, मयुर पावरा, पंकज गावीत, दीपक वळवी,
कल्पेश गावीत, राहुल मावची, पुजा पवार, पवार, वैशाली मावची, अश्वीनी जाधव, सुजिता गावीत, नेहा वसावे, निकीता गावीत, ईशा गावीत, पल्लवी मावची, महिमा गावीत, स्वेता मावची, कल्पना स्नेहा गावीत यांच्यासह विद्यार्थीनी उपस्थित होत्या.








