Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुर्गम भागातील 52 हजार नागरिकांना चार महिन्यांसाठी नवसंजीवनी योजनेतंर्गत पोहोचविले 21 हजार क्विंटल धान्य

Mahesh Patil by Mahesh Patil
June 12, 2022
in राज्य
0
दुर्गम भागातील 52 हजार नागरिकांना चार महिन्यांसाठी नवसंजीवनी योजनेतंर्गत पोहोचविले 21 हजार क्विंटल धान्य

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या दऱ्या- खोऱ्यातील दुर्गम व अतिदुर्गम अशा 64 गावामध्ये राहणाऱ्या 52 हजार 595 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने महसूल आणि अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून 5 हजार 520 एवढा क्विंटल गहू, 16 हजार 109 क्विंटल तांदूळ आगामी चार महिन्यांसाठी पोहोचविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी बजावण्यात आली.

नंदूरबार जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग म्हणजे तापी नदी ओलांडली की सुरू होतात त्या पूर्व- पश्चिम पसरलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा. या डोंगर रांगेतील दऱ्या- खोऱ्यात आदिवासी बांधव नर्मदा नदीच्या काठावर वर्षानुवर्षे वास्तव्य करून आहेत. त्यापैकी अनेकांचा उदरनिर्वाह हा वनोपजांवर आणि हंगामी शेतीवर अवलंबून. त्यामुळे येथील नागरिकांना पावसाळ्यात अन्न उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

पावसाळा सुरू होत असल्याने नंदूरबार जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये नवसंजीवनी योजनेंतर्गत अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आणि पावसाळ्यात जवळपास संपर्क तुटणाऱ्या 64 गावांमधील नागरिकांना चार महिने पुरेल इतका अन्नधान्याचा पुरवठा व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात प्रशासनाच्या वतीने पोहचविण्यात आला आहे.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्यांच्या सीमेलगत नर्मदा नदीच्या काठावरील उडद्या, बादल, भामाणे, सावऱ्यादिगर, भाबरी, मणिबेली, धनखेडी, चिमलखेडी, बामणी, मुखडी, डनेल हा भाग अतिदुर्गम असल्यामुळे या भागात पावसाळ्यात वाहने जात नाही.

पावसाळ्याच्या परिस्थीतीत येथील नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून राज्य शासनाच्या वतीने प्रशासनाने त्यांना पावसाळ्याचे चार महिने (जून ते सप्टेंबर) पुरेल एवढे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे.

या बहुतांश गावामध्ये जाण्यासाठी बोटीने जावे लागते. सरदार सरोवर प्रकल्पातील बाधित अनेक प्रकल्पग्रस्त या भागात वास्तवव्यास आहेत. या गावांना नवसंजीवनी योजनेअंतर्गत जून ते सप्टेंबर महिन्याचे धान्य या गावाना पावसाळ्यापूर्वी धान्य पोहोचविण्यात येवून हे लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.

अक्राणी तालुक्यातील उडद्या, बादल, भामाणे, सावऱ्यादिगर, भाबरी या पाच गावांना तर अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली,धनखेडी,चिमलखेडी,बामणी, मुखडी,डनेल अशा सहा गावांना नवसंजीवनी योजनेंतर्गत जून ते सप्टेंबर महिन्याचे धान्य बार्जद्वारे पोहोचविण्यात येत आहे.

नवसंजीवनी योजनेतंर्गत वितरीत धान्य तपशिल

नवसंजीवनी योजनेतंर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ( प्राधान्य कुटुंबातील) अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील 64 गावातील 17 हजार 864 लाभार्थ्यांना 714.56 क्विंटल गहू व 2858.24 क्विंटल तांदुळ प्रति सदस्यांना प्रति महिना 1 किलो गहू व 4 किलो तांदुळ वितरीत करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (अंत्योदय लाभार्थी ) अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील 64 गावातील 34 हजार 731 लाभार्थ्यांना 1216.60 क्विंटल गहू व 4866.80 क्विंटल तांदुळ प्रति सदस्यांना प्रति महिना 1 किलो गहू व 4 किलो तांदुळ वितरीत करण्यात येणार आहे.

नवसंजीवनी योजनेतंर्गत प्राधान्य कुटुंबाना अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील 64 गावातील 17 हजार 864 लाभार्थ्यांना 1429.12 क्विंटल गहू व 2143.68 क्विंटल तांदुळ प्रति सदस्यांना प्रति महिना 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे. तसेच नवसंजीवनी योजनेतंर्गत अंत्योदय कुटुंबातील अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील 64 गावातील 34 हजार 734 लाभार्थ्यांना 2160.36 क्विंटल गहू व 6241.04 क्विंटल तांदुळ प्रति सदस्यांना प्रति महिना 9 किलो गहू व 26 किलो तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे. असे 5 हजार 520 क्विंटल गहू व 16 हजार 109 तांदुळ याप्रमाणे एकूण 21 हजार 630 क्विंटल गहू व तांदुळ या भागातील नागरिकांना चार महिन्यासाठी वितरीत करण्यात येणार आहे.

नवसंजीवनी योजनेतंर्गत समाविष्ट 64 गावे

अक्राणी तालुक्यातील झुम्मट, उडद्या, बादल, भामाणे,भूषा/खर्डी खु, सावऱ्या दिगर, वेलखेडी, मोडलगाव,गोरबा,जुगणी, हाकडी केली, पोला, पिंपळचोप, अठी, थुवानी केली, निमगव्हाण, शेलगदा, माकडकुंड, गोरडी, कुभरी, रोषमाळ खु.आकवाणी, माळ, बिलगाव, गेंदा, तीनसमाळ, चिचखेडी/ शिक्का/ भरड, डुठ्ठल, वाहवाणी,आग्रीपाडा, नलगव्हाण, गोरडी, डुठ्ठल, निमखेडी, शेलदा, कुभरी, बोरसिसा, भाबरी, खडकी, झापी, फलई, कुंड्या, सिंदी दिगर, सावऱ्यालेकडा, केलापाणी, तोरणमाळ, तळोदा तालुक्यातील अक्राणी महल/ केलापाणी/ थुवापाणी. तर अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली, धनखेडी, चिमलखेडी,चिमलखेडी-2, बामणी, मुखडी, डनेल-2, निंबापाटी, बेटी, ओहवा-1 ओहवा-2, खाई, कोलवीमाळ, कंकाळमाळ, भराडीपादर, दसरापादर, गोरजाबारी,गोरजाबारी-2, चोप्लाईपाडा,डनेल-1 अशा 64 गावांचा समावेश आहे.

“नंदूरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. पावसाळ्यात दुर्गम आणि अतिदुर्गम असलेल्या नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध व्हावे म्हणून चार महिन्यांचे एकत्रित अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी तहसिलदार आणि पुरवठा शाखेचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे.”
-मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदूरबार

बातमी शेअर करा
Previous Post

वादळी वाऱ्यामुळे अनुदानित आश्रमशाळेच्या इमारतीचे पत्रे गेले उडून, लाखांचे नुकसान

Next Post

अक्कलकुवा येथे दगडफेक करून वाहनांची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांतर्फे दुसऱ्या दिवशीही गाव बंद

Next Post
अक्कलकुवा येथे दगडफेक करून वाहनांची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांतर्फे दुसऱ्या दिवशीही गाव बंद

अक्कलकुवा येथे दगडफेक करून वाहनांची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांतर्फे दुसऱ्या दिवशीही गाव बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

October 17, 2025
वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

October 17, 2025
गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

October 17, 2025
एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group