Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ब्रेक द चेन अंतर्गत नवे आदेश जारी :राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १० वाजे पर्यंत सुरु राहणार

Mahesh Patil by Mahesh Patil
August 11, 2021
in राज्य
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
 राज्यात कोविड -१ ९ ची दुसरी लाट आटोक्यात येत आहे . परंतु अद्यापही कोविड रुग्ण आढळून येत असल्याने राज्यात कोविड प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत आहे .त्यानुसार  ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
यात
१ ) उपहारगृहे खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे . Q उपरोक्तनुसार उपहारगृहे / बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री १० वा . पर्यंत मुभा देण्यात येत आहे .
२ ) दुकाने : राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १० वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .
३ ) शॉपिंग मॉल्स : राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १० वा . पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .
 ४ ) जिम्नॅशिअम , योगसेंटर , सलून – स्पा : अ ) वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम , योगसेंटर , सलून – स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १० वा . पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .
५ ) राज्यातील सर्व मैदाने , उद्याने , चौपाटया , समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील ,
६ ) विवाह सोहळे : खुल्या प्रांगणातील, लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण / लॉन / मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .
  खुल्या प्रांगण, लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल . का बंदिस्त मंगल कार्यालय ,हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादित असेल . मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल . या निबंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल, कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल .
७ ) सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स : राज्यात सिनेमागृह / नाट्यगृह , मल्टिप्लेक्स ( स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील .
८ ) धार्मिक स्थळे : राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यत नागरिकांसाठी बंद राहतील .
 ९ ) आंतरराज्य प्रवास : ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना , बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल , अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पुर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहिल . १० ) कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा . सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे . यास्तव गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस , राजकीय , धार्मिक , सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम , निवडणूक प्रचार सभा , रॅली , मोर्चे , इ . वरील निबंध कायम राहतील .
१२) मेडीकल ऑक्सीजनची उपलब्धता मर्यादीत असल्याने , जर राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यास व कोविड रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन ७०० मे . टन किंवा व त्यापेक्षा जास्त ऑक्सीजन लागत असल्यास संपूर्ण राज्यात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करुन त्यानुसार कठोर निबंध लागू करण्यात येतील .
१३ ) राज्यातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की , मास्कचा वापर , हातांची स्वच्छता , शारिरीक अंतराचे पालन , इतरत्र थुकण्यास प्रतिबंध , इ . सर्व निर्वधांचे पालन करणे अनिवार्य राहिल .
हा आदेश दि . १५ ऑगस्ट , २०२१ पासून अंमलात येतील .असे आदेशात म्हटले आहे.सदरचा आदेशावर  मुख्य सचिव , महाराष्ट्र शासन सीताराम कुंटे यांची स्वाक्षरी आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

गझलकारांनी सकारात्मक दृष्टीने व्यक्त व्हायला हवे: नितीन देशमुख

Next Post

राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा १७ ऑगस्टपासून उघडण्याचा निर्णय अखेर रद्द

Next Post

राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा १७ ऑगस्टपासून उघडण्याचा निर्णय अखेर रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते भुमीगत गटारीचे भूमिपूजन

अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते भुमीगत गटारीचे भूमिपूजन

March 26, 2023
नवापूर श्री.राम जन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर, ६०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

नवापूर श्री.राम जन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर, ६०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

March 26, 2023
शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष :राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष :राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

March 26, 2023
माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी फुंकले बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग

माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी फुंकले बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग

March 26, 2023
गावाचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो: भास्करराव पेरे पाटील

गावाचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो: भास्करराव पेरे पाटील

March 26, 2023
नंदूरबार येथे खा.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

नंदूरबार येथे खा.राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

March 26, 2023

एकूण वाचक

  • 2,964,837 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group