म्हसावद l प्रतिनिधी
जोपर्यंत कुटुंबात एकत्र बसून चांगले विचार जोपासत नाही तो पर्यंत तुमचे गाव आदर्श होणार नाही तुम्हाला गाव आदर्श करण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल त्यासाठी गाव तालुका जिल्हा आदर्श होईल या दृष्टिकोनातून गाव आदर्श करण्यासाठी गावागावात व्यसनमुक्ती चा संकल्प वृक्षतोड थांबवत वृक्षलागवड व त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.
याचे उदाहरण म्हणजे गुजरात सरहद्दीवरील शहादा तालुक्यातील बहिरपुर, पुरुषोत्तम नगर, बामखेडा गावाने केलेले काम हे कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन आदर्श तिलक स्वामी यांनी केले
कुकरमुंडा तालुक्यातील सदगव्हाण (गुजरात) येथे स्वामीनारायण मंदिरात प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव निमित्त माझे गाव आदर्श गाव तसेच आदर्श पोलीस पाटील यांच्या सन्मान व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी कोठारी उत्तमप्रकाश, स्वामी पूजनीय पूर्णदर्शन, स्वामी आदर्श तिलक, स्वामी ध्यान जीवन, स्वामी भूषण स्वामी, नारायणप्रिय स्वामी वेदभगत मैत्री आदी संत-महंत उपस्थित होते.
यावेळी स्वामी पुढे म्हणाले, प्रमुख स्वामी महाराजांनी मानवी समाजापुढेउच्च मूल्य स्थापित करताना मानवी समाजापुढे जेव्हा-जेव्हा नैसर्गिक आपत्ती त्याचे उदाहरण म्हणजे गुजरातचे भूकंप आतंकवाद्यांनी मंदिरावर गोळीबार हल्ले कळविले होते व ज्या व्यसनाधीन झालेल्या गावांना नैसर्गिक आपत्तींना प्रमुख स्वामिनी सत्संगी समुदायाला मदत करण्याचे विचार दिले ते स्वतः सामाजिक कामात अग्रेसर राहिले.
पूर्ण देशात आध्यात्मिक विकास व्हायला हवी आदर्श गावांनी तर खरच विकसित देश बनवा समाजात व्यसनमुक्ती होणे गरजेचे आहे माझे गाव आदर्श गाव माझे गाव व्यसनमुक्त गाव याची संकल्पना करा असे आवाहन यावेळी आदर्श तिलक स्वामी यांनी केले वेद भगत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सत्संगी भाविक पंचक्रोशीतील भाविकांना केले.
पुरुषोत्तमनगर ग्रामसेवक शरद पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचे अनेक माझ्या गावाला पुरस्कार मिळवताना प्रत्येक नागरिकांची गाव आदर्श होण्यासाठी बोलायची साथ मिळाली त्यामुळेच आदर्श गावाचा सन्मान मिळतो महाराष्ट्र शासनाच्या सन्माना पेक्षा संतांच्या हस्ते धार्मिक कार्यक्रमात सत्कार होतो हा एक माझ्या गावासाठी अभिमानास्पद बाब असून तो गावासाठी सुवर्ण दिवस आहे कधीही विसरू शकत नाही.
महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष बापू पाटील म्हणाले गावातील तंटे गावातच मिटवण्यात गावात सुखशांती नांदते त्यामुळे गावाचे नाव लौकिक होते तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कार मिळतो त्या पुरस्कारांपेक्षा सन्मान पेक्षाही प्रमुख स्वामींच्या शताब्दी महोत्सवात आदर्श पोलीस पाटील म्हणून सन्मान होणे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना महेंद्रभाई पटेल यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सदगव्हाण येथील युवा व ग्रामस्थ बंधू-भगिनी सत्संगी भाविकांनी परिश्रम घेतले
सन्मान केलेले ग्रामपंचायती, पोलीस पाटील, भागवत सेवा समिती
बहिरपुर पुरुषोत्तमनगर ग्रामसेवक शरद पाटील, बामखेडा येथील सरपंच मनोज चौधरी, उपसरपंच व ग्रामसेवक तसेच आदर्श पोलीस पाटील म्हणून वडाळी येथील गजेंद्र गोसावी व धानोरा बापू पाटील व भागवत सेवा समिती धानोरा साधुसंतांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर बहीरपुर सरपंच कस्तुरा पवार, ग्रामसेविका कविता गवळे पुरुषोत्तमनगर सरपंच प्रतिनिधी वंदना चव्हाण या महिलांचा सन्मान स्वामी नारायण संस्थान सदगव्हाण सरपंच प्रतिभा मराठे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाची क्षणचित्रे
लहान लहान सत्संगी बालक अगदी नियमांचे काटेकोरपणे पालन करत येणाऱ्या भाविकांची सेवा करत होत.
आलेल्या संत महंतांना पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायतीची शासनाची मिळालेले पुरस्कार चीमाहिती पुस्तिका भेट म्हणून स्वामी दारात संस्थांना देण्यात आली.
गुजरात व महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांना भोजन महाप्रसाद दोडे गुजर संस्थांनचे माजी अध्यक्ष वृंदावन पटेल तर मंडप व खुर्च्यांची व्यवस्था यशवंत पटेल शहादा यांच्याकडून करण्यात आली त्यांचाही सन्मान व सत्कार करण्यात आला.