नंदुरबार l प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचा पाया उभारणी करणारे सदगुरू प.पू.मोरेदादा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने सामाजिक,शैक्षणिक,अध्यात्मिक सेवा व उपक्रम राबवण्यात आले.
त्यात प पू गुरुमाऊली यांच्या आशिर्वादाने व गुरुपुत्र गणेश आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने पर्यावरण प्रकृती विभाग व श्री.गंगादशहरा उत्सव पंचसुत्री अभियान अंतर्गत श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक केन्द्र नंदुरबार तर्फे प्रकाशा येथील प्रतीकाशी तीर्थक्षेत्रातील सूर्यकन्या तापीमाता नदीपात्राची संपूर्ण स्वच्छता करुन स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली व जमा झालेल्या कचर्यातुन कंपोस्टखताचे नियोजन करण्यात आले.
नदी काठावर पाणी शुध्द करणार्या व प्रदूषण कमी करणार्या वनस्पतींची लागवड करुन वृक्षारोपन करुन पर्सावरण स्वच्छता व प्रदुषपमुक्त परिसर करण्याची सेवा करण्यात आली.
तसेच जिल्ह्यात ओला किंवा सुका दुष्काळ पडु नये म्हणून तापीमातेला साडीचोळी,श्रृंगार व अलंकार अर्पन करुन संकल्पयुक्त मानसन्मान करण्यात आला.पर्जन्य देवतेची सेवा म्हणुन पर्जन्य सुक्ताचे वाचन करुन अभिषेक करण्यात आला.
सदर सेवा ही सन २००० या सालापासुन अविरत सुरु आहे.या संपुर्ण कृतीयुक्त सेवेनंतर श्री स्वामी समर्थ सेवा केन्द्र नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी जीवन देवरे यांनी नदीपात्र स्वच्छता व प्रतिज्ञा,जमा होणार्या कचर्यातुन कंपोस्ट खत कसे करावे,नदी काठावर पाणी शुध्द करणार्या व प्रदूषण कमी करणार्या वनस्पतींची माहिती व लागवड या विषयावर प्रबोधन व मार्गदर्शन केले.
या समाजउपयोगी सेवेसाठी जिल्हभरातुन जवळपास दोन हजारांच्या वरच्या संख्येने सेवेकरी उपस्थित होते.समाजभिमुक कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा संस्कार विभागातील व इतर सर्व सेवेकरी यांनी मोलाची सेवा व सहकार्य केले.