नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यातील ऊसतोड कामगांराचे व त्यांच्या कुटूंबाचे जीवन अस्थीर व अत्यंत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकारक करुन त्याचे राहणीमान उंचावुन ऊसतोड कामगांराना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगाराना ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी संबंधित ग्रामसेवकाकडे संपर्क साधुन ग्रामपंचायतीत नोंदणी करावी. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.
नोंदणीसाठी ऊसतोड कामगार हा ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत तेथे सतत किमान तीन वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम करीत असावा.ऊसतोड कामगारांनी नोंदणी करुन ग्रामसेवकाकडून विहीत नमुन्यात ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे. जेणेकरुन ऊसतोड कामगांराना विविध शासकीय योजनेचा लाभ देणे सोईचे होईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे (दूरध्वनी क्रमांक 02564-210025 ) संपर्क साधावा.








