नंदुरबार l प्रतिनिधी
पाणी फाऊंडेशन आयोजित वाटर कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गावांसाठी पुढचे पाऊल म्हणून सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा पानी फाऊंडेशन कडून नंदुरबार तालुक्यातील 28 गावांमध्ये राबविण्यात येत आहे.
या स्पर्धेचा एक भाग म्हणून फार्मर कप स्पर्धा या वर्षीच्या खरीप पिकासाठी घोषित केली आहे,या स्पर्धेच्या प्रशिक्षण घेण्यासाठी नंदुरबार तालुक्यातील 12 गावांच्या शेतकऱ्यांची पहिली बॅच जळगाव येथे काल रवाना झाली. या शेतकऱ्यांच्या बॅचच्या बसला तालुका कृषी अधिकारी स्वप्निल शेळके यांनी नारळ फोडून हिरवी झेंडी देत नंदुरबार बसस्थानकावरून रवाना केले.यावेळी नंदुरबार बसडेपो चे आगार प्रमुख मनोज पवार,वळवी यांच्यासह पाणी फाऊंडेशन समन्वयक व 12 गावांचे गावकरी उपस्थित होते.