नंदुरबार l प्रतिनिधी
आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमास 14 एप्रिल रोजी चार वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार 16 एप्रिल रोजी आरोग्यवर्धिनी दिन साजरा करण्यात आला. या वर्षी आरोग्यवर्धिनी दिनाची थीम इ संजीवनीच्या माध्यमातून आरोग्य वर्धिनी केंद्राच्या ठिकाणी टेलिकन्सलटेशन सेवा उपलब्धता ही आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्यवर्धिनी कार्यक्रम हा केंद्र शासनाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यात 248 उपकेंद्र व 58 प्राथमिक आरोग्य केंद्र व 3 नागरी आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमास आरोग्य केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉ.भारती पवार यांनी सर्व उपस्थितांना झूम मिटींग व्दारे आरोग्यवर्धिनी केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष वार्तालाभ करून कामकान जाणून घेत मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हास्तरीय आरोग्यवर्धिनी कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी,आरोग्य सभापती अजित नाईक, सर्व सभापती, जिल्हाधिकारी श्रीम. मनीषा खत्री,मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी केंद्र आष्टे येथे आयोजित करण्यात आला त्यात प्रमुख अतीथी खा. डॉ. हिना गावीत,आ. डॉ.विजयकुमार गावीत, आष्टे गटातील जिल्हा परिषद सदस्य देवमण पवार,कोळदा गटाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुप्रिया गावीत,आष्टे गणाचे पंचायत समिती सदस्य तथा पंचायत समिती उपसभापती कमलेश महाले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद पंडित चौधरी, नंदुरबार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जाफर तडवी,प्रा.आ.केंद्र आष्टे चे वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपीन वळवी,डॉ. योगेश पाटील तसेच आष्टे गावातील प्रतिष्ठित नागरिक कर्मचारी वर्ग हजर होते.त्याच बरोबर नंदुरबार तालुक्यात नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र माळीवाडा, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र लोय,आरोग्य वर्धिनी उपकेंद्र सिंदगव्हान, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र नांदरखेडा,शहादा तालुक्यात आरोग्य वर्धिनी केंद्र प्रकाशा व आरोग्यवर्धिनी केंद्र पाडळदा,तळोदा तालुक्यात बोरद, अक्कलकुवा तालुक्यात आरोग्यवर्धिनी केंद्र खापर,नवापूर तालुक्यात आरोग्यवर्धिनी केंद्र चिंचपाडा येथे प्रातिनिधिक स्वरुपात तसेच जिल्ह्यातील 58 आरोग्यवर्धिनी केंद्र, 223 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व 3 नागरी आरोग्यवर्धिनी ठिकाणी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी यांचे उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला.केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आलेल्या रुग्णांना टेलि कन्सलटेशनव्दारे आरोग्य सेवा उपलब्धता करून देण्यात आली. तसेच आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रम निमित्त जिल्ह्यात खालील प्रमाणे आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 18 एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय,म्हसावद ता. शहादा, 19 एप्रिल ग्रामीण रुग्णालय धडगाव, 20 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय नवापूर, 21 एप्रिल ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा, 22 एप्रिल जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार, सदर ठिकाणी आरोग्यमेळाव्या निमित्त आरोग्य सेवा देण्यात येणार असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन जिल्हाधिकारी श्रीम, मनीषा खत्री,मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद पंडित चौधरी यांनी केले आहे.