नंदुरबार । प्रतिनिधी
तालुक्यातील रजाळे येथे लोकवर्गणीतून साकारण्यात आलेल्या मंदिरांमध्ये नवमीला श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि चैत्र शुक्ल 5 ला धनदाई देवी या मुर्त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गावात अखंड हरीनाम पारायण सप्ताहात किर्तनांचेही आयोजन केले आहे. सदरचे कार्यक्रम दि.4 ते 11 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत.
धनदाईमाता प्राणप्रतिष्ठा व भव्य मिरवणूक
यादरम्यान आदी धनदाई मातेची समाज बांधवांतर्फे दि.4 एप्रिल रोजी मूर्तीची गावातून मिरवणूक तर 5 रोजी होम हवन व पुजन सोहळा तसेच 6 रोजी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा, 7 रोजी यज्ञ पुजन सोहळा तर 9 एप्रिल रोजी महाप्रसाद देण्यात येणार आहे. यानंतर पुढील कार्यक्रम.
श्रीराम मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि भव्य मिरवणूक
रामनवमीनिमित्त गावात मूर्तींची प्रतिष्ठापणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि.7 एप्रिल रोजी श्रीराम मुर्तींची गावातून सवाद्य मिरवणूकीचे आयोजन केले आहे. तर 8 रोजी श्री गणेश पूजन, 9 रोजी होम हवन व यज्ञ पुजन तर 10 एप्रिल रोजी राम नवमीच्या दिवशी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. तसेच 11 एप्रिल सोमवारी सकाळी 9 ते 11 वा.ह.भ.रविदास महाराज (वरसाळेकर) यांचे काल्याचे किर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. याचा पंचक्रोशीतील नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रजाळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनंदिन कार्यक्रम किर्तन सोहळा
पहाटे 4 वाजता प्रभातफेरी, 5 वा काकडा आरती, सकाळी 8 ते 11 व दुपारी 2 ते 5 वाजेदरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ रात्री 8.30 ते 10.30 या वेेळेत किर्तन सोहळा. तसेच दि.4 एप्रिल रोजी ह.भ.प.रविंद्र महाराज वावडेकर, 5 रोजी दिलीप महाराज बीडकर, 6 रोजी लिलाधर महाराज ओझरकर, 7 रोजी आनंदराव महाराज, बोरकुंड, 8 रोजी नाना महाराज नरडाणे, 9 रोजी मोहन महाराज पिंप्रीकर, 10 रोजी विजय महाराज पिंपळनेर, 11 रोजी रविदास महाराज वरसाळे यांचे या सप्ताहात किर्तन होणार असून यासाठी रजाळे तुकाराम भजनी मंडळाचीही साथ लाभणार आहे. तर या विधीसाठी वेदूमूर्ती रविंद्र रमेश पाठक सैताणे, हेमकांत रमेश उर्फ (रामु) महाराज अलाणे, गावाचे महाराज शशिकांत रमेश पाठक, विपुल महाराज, धुळे या पुरोहितांच्या उपस्थितीत यज्ञ सोहळा पार पडणार आहेत. तर श्रीराम व हनुमान मंदिराचे शिल्पकार नंदकिशोर महादेव कुबळे (महाराज) लोणीकर जि.अमरावती यांचे योगदान लाभले आहे. या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण गावकऱ्यांकडून गुढी उभारून व महिला वर्गाकडून घरोघरी रांगोळी काढून स्वागत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे परिश्रम सर्व गावकरी करणार आहेत.