नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मिठ्याफळी गावाच्या शेत शिवारात शेतीच्या वादातून दोघांना मारहाण केल्याप्रकरणी १० संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील मिठ्याफळी येथील नाजनिमोद्दीन बदरोद्दीन मक्राणी व अब्दुल रऊफ अन्सारी यांच्यात शेतीवरुन वाद होता. या वादातून मिठ्याफळी गावाच्या शेत शिवारातील क्षेत्र क्र.१०३ मध्ये नाजिमोद्दीन बदरोद्दीन मक्राणी व शकीलोद्दीन वजीरोद्दीन यांना अब्दुल रऊफ अन्सारी याने हातातील तलवारीचा धाक दाखवून धमकाविले. तसेच फारुख रऊफ अन्सारी, करीम लतिफ आलीम लतिफ, आलीम लतिफ यांनी दोघांना धरुन रहिम लतिफ याने छातीवर बुक्क्याने मारहाण केली. शकूर रहिमान अन्सारी, अफिस रहिमान अन्सारी, रऊफ रहेमान अन्सारी, शाहीर अमिन अन्सारी व अशर अमिन अन्सारी यांनी शिवीगाळ व जिवेठार मारण्याची धमकी देत लाकडी दांड्याने मारहाण केली. याबाबत नजिमोद्दीन बदरोद्दीन मक्राणी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात १० संशयितांविरोधात भादंवि कलम १४७, १४८, १४३, ३२४, ३२३, ५०४, ५०६, महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर कोळी करीत आहेत.