म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पाडळदा येथील वल्लभ विद्या मंदिरात शैक्षणिक वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन रमेश चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील व संस्थेचे सचिव डॉ.विलास पटेल होते. प्रास्ताविक पर्यवेक्षक अंबालाल चौधरी यांनी केले .संस्थेचे सचिव डॉ.विलास पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, जीवन जगण्याची कला, जिथे शिकवली जाते ते ठिकाण म्हणजे माध्यमिक शाळा होय. विद्यार्थ्यांनी जीवनात सारथी बनावे पण महाभारतातील कृष्णा सारखे कितीही मोठे झालात तरी शाळा व गुरूंना विसरू नका असे सांगितले. संस्थेचे चेअरमन रमेश चौधरी यांनी सांगितले की, संस्काराची शिदोरी मिळण्याचे ठिकाण म्हणजे माध्यमिक शाळा, ग्रामीण भागातून शहरी भागात जाणारे असल्यामुळे आपल्या मनामध्ये कोणताही न्युनगंड न ठेवता यश मिळवण्याचा प्रयत्न करा. गावाच्या व शाळेचा नावलौकिक वाढवा असे आवाहन केले. अभ्यासात आपल्याला ज्याची आवड आहे तेच क्षेत्र निवडा आई वडिलांना विसरु नका. असे आवाहन केले. या वेळी विश्राम पाटील, महेंद्र पटेल, चतुर पाटील ,भरत पाटील ,गणेश पाटील .यांनी मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांमधून निलेश पाटील ,कल्पेश सोनार, हिमांशू मिस्तरी ,गौरव कोळी, हेमंत सोनार ,आदेश ईशी ,लोकेश कोळी ,नम्रता पाटील, पल्लवी बच्छाव ,ज्योती कुवर ,वर्षा वळवी, लाखी पाडवी, आकांक्षा पाटील, ममता पावरा, सपना कोळी, प्रणाली पटेल, कल्याणी पाटील .यांनी शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.तसेच 2021 /22 या शालांत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शाळेला भेट म्हणून राष्ट्रीय नेते व संतांच्या अठरा प्रतिमा संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाकडे भेट म्हणून दिल्या कार्यक्रमाला संचालक जगन्नाथ पाटील,वासुदेव पाटील,संजय चौधरी,दशरथ पाटील,सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते आभार मल्हारराव ठाकरे यांनी मानले.