नंदूरबार l प्रतिनिधी
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे जिल्ह्यातील वन हक्क दावेदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बिडार मोर्चाचे आयोजन करुन विसरवाडी गावात हार्दीक पेट्रोल पंपाजवळ ८०० ते १०० लोकांना जमाव जमवून जिल्हाधिकारी यांच्या जमाव आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये कोणतेही मोर्चा काढण्यास तसेच एका ठिकाणी २०० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई असल्याचे माहित असतांना देखील त्यांनी जाणीवपुर्वक सत्यशोधक ग्रामिण कष्टकरी सभेच्या वतीने विविध मागण्या संदर्भात बिढार मोर्चाचे आयोजन करुन विसरवाडी गावात हार्दीक पेट्रोल पंपाजवळ ८०० ते १०० लोकांना ( महिला पुरुष ) असे एकत्र जमवुन विसरवाडी ते बिजगाव पर्यंत बिढार मोर्चा काढुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोशि.निलेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिस ठाण्यात जिल्हा अध्यक्ष रामसिंग गावीत रा.दापुर ता.नवापूर, रंजीत वंत्या गावीत रा. वागदी नवापुर, जगन हुरजी गावीत रा- बोरझरी, ता.नवापुर, दिलीप वसंत गावीत रा. नवापुर यांच्या विरुद्ध भादंवि कलम १८८ , २६८,२६९ , सह महा पो अधि क ३७ ( १ ) ( ३ ) चे उल्लंघन क १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास असई दिलीप गावीत करीत आहेत.