नवापूर l प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्षा मुळे नवापूर तालुक्यातील धनराट बोकळझर रस्त्यावरील पुला वरून 15 ते 20 फूट खाली पडल्याने एक युवकाचा जागीच मृत्यू झाल्याचे घटनेने खळबळ उडाली आहे
सन 2017-18 मध्ये महापूर आल्याने पुलावरील कठडे पाण्यात वाहून गेले त्या वेळे पासून स्थानिक सरपंच आणि सदस्यांनी नियमित तक्रारी केल्या आहेत महापूर आला त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला सूचना देऊन ही पुलाची दुरुस्ती झालेली नाही पायी चालणारे तसेच वाहन धारक आपला जीव मुठीत घेऊन पुला वरून प्रवास करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासना कडून गेल्या दोन ते तीन वर्षात कोणतीही पुलाची दुरुस्ती झाली नसल्याचे म्हटले असून ह्या घटनेला प्रशासन जवाबदार असल्याचे आरोप स्थानिकांनी ग्रामस्थ यांनी केला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली असल्याची चर्चा आहे
दि 3 मार्च राजी सायंकाळी 9 वाजेच्या सुमारास ऊसतोड मजूर दिनकर कागड्या वसावे रा. उमरागाव, ता.अकलकुवा येथील रहिवासी पायी पुला वरून जात असताना तोल खाली गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता.या घटनेची माहीती बोकलझर सरपंच राहुल गावीत यांना मिळताच त्यांनी १०८ रुग्णवाहीकेला बोलाऊन जखमी रुग्णीला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक रहिवासी यांनी अनेक वेळा मौखिक तक्रारी करून ही प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनात आले असून प्रशासन अजून मोठ्या अपघाताची वाट बघत आहेत की काय अशी चर्चा ग्रामस्थ यांच्या मध्ये सुरु होती या घटनेचा तपास पोहेका प्रताप वसावे करीत आहे.