नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील चौपाळे येथे जागेच्या वादातून मेहुण्याला मारहाण होत असल्याने भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय युवकाला प्राण गमवावा लागल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदूरबार तालुक्यातील चौपाळे येथील संशयित आरोपी बालचंद राठोड यांनी चौपाळे गावातील गावठाण जागेत घर बांधले होते. त्यामुळे फिर्यादी यांची वहिवाट रस्ता बंद झाला होता त्यामुळे फिर्यादी संदिप सुभाष कुमावत यांच्या वडीलांनी त्यांच्याविरुद्ध कोर्टात केस केली होती त्याचा राग मनात धरून . दि.4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.45 वाजे दरम्यान चौपाळे येथील ज्ञानेश्वर माऊली चौकात संदिप सुभाष कुमावत हे बसलेले असताना बालचंद दलपत राठोड, राजेंद्र बालचंद्र राठोड अशांनी संदिप यास अतिक्रमण करुन घर बांधले आहे . ते तुला तोडावे लागेल असे बोलुन शिवीगाळ केली त्यानंतर तेथे सुदाम दलपत बंजारा, ज्ञानेश्वर दलपत बंजारा सर्वांनी एकत्र येत शिवीगाळ करून संदिप सुभाष कुमावत मारहाण करीत असताना संदिप यांचा यांचा शालक मयत दिपक प्रकाश कुमावत (वय 26 वर्षे) रा . चौपाळे ता.जि.नंदुरबार संदिप यांना सोडवण्यासाठी आला तेव्हा बालचंद राठोड . सुदाम बंजारा व ज्ञानेश्वर बंजारा या तिघांनी संदिप कुमावत यांना घट्ट पकडुन ठेवले व त्यावेळी राजेंद्र राठोड यांने मयत दिपक प्रकाश कुमावत याच्या गुप्तांगावर जोराने लाथ मारल्याने त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी संदिप सुभाष कुमावत यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात बालचंद दलपत राठोड, राजेद्र बालचंद्र राठोड, सुदाम दलपत बंजारा, ज्ञानेश्वर धनसिंग बंजारा सर्व रा . चौपाळे ता . नंदुरबार यांच्या विरूद्ध भादवि कलम 302,323,504,506.34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत.