नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. वसलाई ता. नंदुरबार येथे जलकुंभाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. पाण्यामुळे नागरिकांचे बरेचसे प्रश्न सुटत असल्याने शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
नंदुरबार तालुक्यातील वसलाई येथे गुरुवारी दुपारी जलजिवन मिशन अंतर्गत पिण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी म्हणाल्या, जल जीवन मिशन योजनेत केंद्र व राज्याच्या 50 टक्के वाटा आहे. नागरिकांचे पाण्याचे प्रश्न सुटावेत यासाठी शासनाची अत्यंत चांगली योजना आहे. पाण्यामुळे सर्वाधिक हाल महिलांचे होत असतात. गावात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असते. परंतु, आता जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या त्यांच्या घरा पर्यंत पाणी पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जि.प उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी म्हणाले, वसलाई गावाला कधीही पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जलजिवन मिशन अंतर्गत 35 लाखाच्या पाण्याच्या टाकीला मंजुरी देण्यात आली. गावातील नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा असतील त्या पूर्ण करण्याच्या प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमप्रसंगी प्रसंगी पं.स उपसभापती कमलेश महाले, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, माजी बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे,पं.स सदस्य तेजमल पवार,धर्मेंद्र परदेशी, सरपंच श्रीमती आशा वळवी, माजी सरपंच मंगलसिंग वळवी, उपसरपंच मांगीलाल वळवी,ग्रा.पं सदस्य दयाराम वळवी, श्रीमती आवशी वळवी, जितेंद्र वळवी,भांगडाचे सरपंच पुरुषोत्तम वसावे,उपसरपंच अमृत वसावे, चंपालाल महाराज, विश्राम वळवी, महेश वळवी,निखील वळवी आदी उपस्थित होते.