Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शेतकरी समृद्ध व्हावा : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,

Mahesh Patil by Mahesh Patil
January 31, 2022
in राजकीय
0
ग्रामीण भागाच्या विकासासाठी शेतकरी समृद्ध व्हावा : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,

नंदुरबार l प्रतिनिधी
प्रत्येक शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावा, या उद्देशाने ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना’ मग्रारोहयोतून राबविण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरी, गोठा कॉंक्रिटीकरण व मातोश्री पानंद रस्त्याच्या वैयक्तिक पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचे वाटप शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
नंदुरबार पंचायत समिती अंतर्गत ३९ पात्र लाभार्थ्यांना आदेश वितरित करण्यात आले.याप्रसंगी जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी, पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, जि.प.सदस्य. देवमन पवार.डॉ.सयाजीराव मोरे, सुरेश शिंत्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील. पंचायत समिती सदस्य तेजल पवार,प्रल्हाद राठोड, संतोष साबळे,अंबु पाडवी,सुनील पाडवी, धर्मेंद्र परदेशी व तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

अशी आहे योजना
ग्रामीण भागात म.गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्ग वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असतात.अनियमित,अपु-या पावसामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत व पुनर्वसन विभागाकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. यावर शाश्वत व कायमस्वरुपी उपाययोजना करणेची आवश्यकता असल्याने सिंचन विहिरी च्या लाभ देण्यात येत असतो. प्रत्येक शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावा, या उद्देशाने ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना’ मग्रारोहयोतून राबविण्यात येत आहे. गाव समृद्ध करण्यासाठी शेतरस्त्यांचे महत्व शहरांना जोडणाऱ्या महामार्गाच्या महत्त्वाएवढे आहे. पाणंद रस्त्याच्या अभावामुळे शेतमालाच्या वाहतुकीला मर्यादा येतात आणि त्यामुळे शेतकरी फायद्याचे पीकही घेत नाहीत. त्यामुळे प्रमाणित दर्जाचे शेत पाणंद रस्ते तयार करण्याकरिता ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना’ येत आहे. त्याचप्रमाणे शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत गोठा कॉंक्रिटीकरण करण्यात येते.

असे आहेत लाभार्थी

● सिंचन विहिरीवचे ३१ लाभार्थी

● मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद रस्ते योजनेअंतर्गत २ लाभार्थी

● गोठा कॉंक्रिटीकरण अंतर्गत ६ लाभार्थी

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 4 थी चे वर्ग मंगळवार पासून होणार सुरु

Next Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post
राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group