नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र सरकारने तीन काळे कृषी विधेयके रद्द केल्याची घोषणा केल्याने भारतीय किसान सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल बांधवांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
पंतप्रधानांनी आज शुक्रवारी देशाला संबोधित करताना केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी विधेयके रद्द केल्याची घोषणा केली. घोषणेनंतर शेतकरी संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे. भारतीय किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडित तडवी यांच्यासह कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन तेथील हमाल बांधवांना पेढे भरावीत आनंदोत्सव साजरा केला.
तीन कृषी कायदे रद्द करावे यासाठी भारतीय किसान सेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात आवाज उठवण्यात आला होता. वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदने देण्यात आली होती. यावेळी प्रदेश महासचिव पंडित तडवी म्हणाले, भारतीय किसान सेनेतर्फे दिल्ली सीमा रेषेजवळ अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाणार नाही.
यावेळी जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, जिल्हा महासचिव आधार ठाकरे, विमुक्त भटके आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव,तालुका उपाध्यक्ष रविदास वळवी,सुनील भिल,किसन महाराज आदी उपस्थित होते.