नंदुरबार | प्रतिनिधी
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून गरिबांना लुटायचे आणि उद्योगमंत्री खिसे भरायचे हा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. याचाच परिणाम म्हणून देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एकाबाजूला दरवाढ, महागाई आणि दुस-या बाजूला प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी व केंद्राचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे गरीब, शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे कठिण झाले आहे. याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्यावतीने नंदुरबार जिल्ह्यात दि.१४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण सप्ताह अभियान राबविण्यात येणार असून जेलभरो आंदोलनही करण्यात येणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी राजाराम पानगव्हाणे यांनी दिली.
नंदुरबार येथे कॉग्रेस कार्यलयात पत्रकारपरिषदेला संबोधित करताना राजाराम पानगव्हाणे म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सातत्याने इंधनाचे दर आणि महागाई वाढवून देशातील गरीब मध्यमवर्गीय जनतेची लूट करत आहे. गेल्या एका वर्षात खाद्य तेलाच्या किंमती दुप्पट वाढल्या आहेत. इंधनाच्या किंमतीत एका वर्षात प्रति लिटर जवळपास ३५ रूपयांची वाढ सरकारने केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना देशात मात्र त्या दररोज वाढत आहेत. युपीए सरकारवेळी ४४० रुपयांना मिळणारा एलपीजीगॅस आता ९५० रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस ९५० रुपयांपर्यंत महाग केला गेल्या ८ महिन्यात केंद्र सरकारने जवळपास ७५ वेळा इंधन दरवाढ केली. पेट्रोल ११० रुपये, डिझेल ९६ रुपये लिटर असून गॅसच्या किंमतीही सातत्याने वाढवून इंधनावरील कररूपाने मोदी सरकारने सात वर्षात तब्बल २५ लाख कोटी रुपयांची नफेखारी करून जनतेचे आर्थिक शोषण चालवले आहे..या कृत्रीम दरवाढीविरोधात कॉंग्रेस पक्षाने वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत .मोदी सरकारच्या या लोकविरोधी धोरणाबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूयांच्या जयंती दिनापासून म्हणजेच दि १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत कॉंग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक.जि.प.सदस्य, प स.सदस्य,पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात आणि गाव खेड्यात लोकांच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गावात मुक्काम करून लोकांशी संवाद साधतील. केंद्र सरकारने इंधनदरबाट करून महागाई कशी वाढवली आहे याची माहिती लोकांना देतील. या सर्व कार्यक्रमाची माहिती प्रदेश कॉंग्रेसच्या सोशल मीडिया हँडल्सवरून उपलब्ध करून दिली जाईल.आणि जनजागृतीसाठी सोशल मीडियाचाही वापर केला जाईल असे राजाराम पानगव्हाणे यांनी सांगीतले.
यावेळी माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ऍड.पद्माकर वळवी म्हणाले कि,केंद्र सरकारला जागृत करण्यासाठी अनेक आंदोलन केली.याच्या सर्वसामान्य जनतेला सहभागी करण्यासाठी दि १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे.यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सहभागी होत.गावगावी जात केंद्र सरकारचा कारभार नागरीकांपर्यंत पोहचवणार आहोत.सर्वसामान्य नागरीकांची पिळवुणुक थांगवण्यासाठी जनजागर करणार आहोत असे यावेळी.श्री.वळवी यांनी सांगीतले.
दरम्यान कॉग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी सांगीतले कि,कॉग्रेसतर्फे सदस्य नोंदणी करण्यात येत आहे.जिल्ह्यात लोकसभेत विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा दिड पट अधिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आहे.जनजागर अभियानासाठी नियोजन करण्यात येत आहे.
यावेळी जिल्हा सहप्रभारी रणजित पावरा, जि.प.सदस्या हेमलता शितोळे, शहादा प.स.उपसभापती संगीता पाटील,पंडीतराव पवार, राजेंद्र पाटील,प्रविण पाटील आदी उपस्थीत होते.








