Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खोंडामळी ग्रामपंचायतीकडे थकबाकीमुळे पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा केला खंडित, ग्रामस्थांची पाण्यासाठी दहादिशा

team by team
October 30, 2021
in सामाजिक
0
खोंडामळी ग्रामपंचायतीकडे थकबाकीमुळे पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा केला खंडित, ग्रामस्थांची पाण्यासाठी दहादिशा

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी ग्रामपंचायतीकडे थकबाकीमुळे पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे तीन दिवसापासून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. ग्रामपंचायतीकडून गावात घरपट्टी वसुली करण्यास सुरुवात झाली असून, ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांकडे आतापर्यंत ५० लाख ९१ हजार २२८ रुपये थकबाकी असल्याने ग्रामपंचायतीस मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.


ग्रामपंचायतिची निवडणूक आली तेव्हा गावातील ठराविक लोक घरपट्टी भरतात तर ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून दाखला पाहिजे तेव्हा घरपट्टी पैकी पाचशे ते हजार रुपये देऊन वेळ मारून नेली जाते.त्यामुळे ग्रामपंचायतीचा थकबाकीचा आकडा दर वर्षी वाढत जातो. काही ग्रामस्थांकडे वीस वर्षे पेक्षा अधिक घरपट्टी असल्याची माहिती ग्रामसेवक निकम यांनी दिली. विद्युत मंडळाचे स्ट्रीट लाईटचे विद्युत बिल ग्रामपंचायतीने भरले. गावातील दोन वॉटर सप्लाय चे प्रत्येकी १७ लाख रुपये बाकी आहे. एप्रिल पासून ग्रामपंचायतीकडे सहा बिले बाकी आहेत. वॉटर सप्लायचे मागील बिल ८० हजार रुपये बाकी आहेत. वीज मंडळाकडून ग्रामपंचायतीस अडीच महिन्यांपासून वेळोवेळी विज बिल भरण्याची जाणीव करून देण्यात आली , मात्र विज बिल न भरल्या अखेर तीन दिवसापूर्वी पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. ग्रामपंचायत व विद्युत कंपनीच्या कारभारामुळे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी खोल गेली असल्याने गावाच्या जवळपास पाणी लवकर उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थ ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.लवकर वीज बिल भरून लवकर पाणीपुरवठा सुरू करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने पाणी समस्या झाली आहे विहिरीला पाणी आहे परंतु वीज पुरवठा खंडित झाल्याने व जवळपास पाणी उपलब्धता कमी असल्याने ग्रामस्थांना जंगलातून पाणी आणावे लागते मी येथून चार किलोमीटर धामडोद शिवारात असलेल्या शेतातून पाणी आणत आहे.
रवींद्र शांताराम पाटील, ग्रामस्थ खोंडामळी.

 

 

 

खोंडामळी सब स्टेशन अंतर्गत वीस पाणी व पुरवठा साठी वीज जोडणी दिली आहे, त्यापैकी बहुतेकांनी चालू बिलातील काही रक्कम जमा केल्याने त्यांचा विद्युत पुरवठा सुरू आहे. मात्र अडीच महिन्यांपासून खोंडामळी ग्रामपंचायतीने विज बिल न भू भरल्याने वरिष्ठांच्या आदेशाने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.चालू विद्युत बिल च्या रकमेपैकी वीज बिलाची रक्कम जमा केल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल.

जागृती साळुंके,                                               सहाय्यक अभियंता, खोंडामळी सबस्टेशन.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरेंनी केली गरिबांची दिवाळी गोड, रायलाल नगरात मोफत साखर वाटप

Next Post

नंदुरबार येथे कलाविष्कार प्रतिष्ठानतर्फे आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळेचे आयोजन

Next Post
नंदुरबार येथे कलाविष्कार प्रतिष्ठानतर्फे  आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळेचे आयोजन

नंदुरबार येथे कलाविष्कार प्रतिष्ठानतर्फे आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add