Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार कृषी सहायकांचा एल्गार,एक दिवशीय धरणे आंदोलनातुन प्रशासनाचे वेधले लक्ष

team by team
May 20, 2025
in राज्य
0
प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार कृषी सहायकांचा एल्गार,एक दिवशीय धरणे आंदोलनातुन प्रशासनाचे वेधले लक्ष

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्यातील हजारो कृषी सहायकांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केले तसेच वेळोवेळी आश्वासने मिळाल्यानंतरही मागणी पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कृषी सहायकांनी आंदोलनाचा बिगुल वाजविला. प्रलंबित मागण्यासाठी नंदुरबार जिल्हा कृषी सहायक यांनी एल्गार पुकारून एक दिवसीय धरणे आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधले. नंदुरबार जिल्ह्यातील कृषी सहाय्यक संघटनातर्फे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

 

या संदर्भात नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती करावी, कृषी सहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, कृषी सहायकांना लॅपटॉप उपलब्ध करून देणे, ग्राम स्तरावर कामकाजासाठी मदतनीस नियुक्त करावे,

 

 

 

कृषी विभागाचा आकृतीबंध उपलब्ध करुन 4:1 प्रमाण करणे, आदी प्रमुख मागण्याचा समावेश आहे. एक दिवसीय धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष टि.के. वळवी, उपाध्यक्ष मदनलाल कायत, जिल्हा कार्याध्यक्ष सुशीलकुमार पाटील, सरचिटणीस धीरज खैरनार, कोषाध्यक्ष जयपाल गावित, जिल्हा सचिव सचिन दराडे, राज्य प्रतिनिधी सुधीर वाघमारे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख निलेश रावताळे, जिल्हा संघटक राकेश पावरा, योगेश मिस्त्री, रमण कोकणी, नंदुरबार तालुका अध्यक्ष नरेंद्र देसले, सुरेश गावित नवापूर, शिलेदार पावरा तळोदा, फिलिप वळवी अक्कलकुवा, मनोहर पावरा धडगाव, चौधरी वसावे शहादा तसेच जिल्ह्यातील कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

रोडाली लोककला आदिवासी लोक संस्कृतीचा अविभाज्य घटक; आ.चंद्रकात रघुवंशी

Next Post

लोकशाही दिनात तक्रारींचे निवारण करण्याऐवजी अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप

Next Post
लोकशाही दिनात तक्रारींचे निवारण करण्याऐवजी अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप

लोकशाही दिनात तक्रारींचे निवारण करण्याऐवजी अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी आज सर्वपक्षीय शोकसभा

January 31, 2026
सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

January 31, 2026
मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

January 30, 2026
भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

January 29, 2026
भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

January 29, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add