Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वस्त धान्यासाठी करावी लागते 10 की.मी.पायपीट

team by team
October 17, 2021
in आरोग्य
0
स्वस्त धान्यासाठी करावी लागते 10 की.मी.पायपीट
तळोदा l प्रतिनिधी-
स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी पायपिट करत खर्डी येथे धान्य घेण्यासाठी संपूर्ण कुटुंब दर महिन्याला साधारण 10 की.मी. पायपीट करावी लागत आहे. पावसाळ्यात पायपीट केल्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. उन्हाळा किंवा हिवाळ्यात सायकल, दुचाकीवर जाऊन रेशनिंगचे धान्य आणत असतात. फक्त साधारण शंभर रुपयांचे धान्य विकत घ्यायला जीव धोक्यात घालून पायपीट करणारे आदिवासी बांधव आणि महिला भगिनी पहिल्या तर अंगावर काटाच येतो.
     केंद्र शासनाने कोरोना काळात उत्पन्नाचे साधन ठप्प झालेल्या गोर- गरिब जनतेसाठी काही महिन्यासाठी मोफत धान्य वाटप योजना जाहीर केली होती. मोफतचे व शंभर रुपयांचे धान्य घेण्यासाठी सातपुड्याच्या दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिक, स्वातंत्र्य मिळूनदेखील 74 वर्षांनंतरही, गाव-पाडा अतिदुर्गम भागातील नागरिक, सातपुड्याच्या कडेकपरीतून रस्ता तुडवत, धान्य आणण्याची कसरत करीत जीवन जगत आहेत. या परिसरातील नागरिक अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचीत आहेत.
       नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गाव-पाड्यांवर रस्ता नसल्याने दळणवळणाच्या प्रवाहापासून कोसो दूर आहेत. तसेच काही गाव-पाड्यांमध्ये वीज सुद्धा नसल्याने अद्यापही अंधारात जीवन जगत आहेत. त्यात तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बेडवाई हे गाव सुद्धा विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. बेडवाई हे गाव अलवान गृप ग्रामपंचायत अंतर्गत येत असते. ह्या गावांमध्ये साधारण 500 नागरिक रहात आहेत. येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथील कुटुंबांना शासनामार्फत मिळणाऱ्या रेशनिंग आणण्यासाठी तब्बल दहा ते पंधरा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे भयानक चित्र पाहून मन सुन्न होते. ह्या गावांपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने चारचाकी वाहन पोहचत नाही, त्यामुळे सदरील गावांना शासनामार्फत पोहचणारा रेशनिंग हा खर्डी येथील रेशन दुकानदाराकडे पोहचवावा लागतो. व तेथून गावातील नागरिक दरमहिन्याला तब्बल ये-जा करून दहा ते पंधरा किलोमीटर पायपीट करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा जीव मेटाकुटीला आला आहे. दररोज पोटासाठी राब-राब राबणाऱ्या नागरिकांना रेशन आणण्यासाठी तसेच शासनाची सुविधा घेण्यासाठी सुद्धा पायपीट करावी लागते हीच मोठी शोकांतिका आहे.
       बेडवाई गावातील नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या निशुल्क प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ आणण्यासाठी खर्डी येथे नदी, दऱ्याखोऱ्यातून, पायवाट तुडवत, शेत शिवारामधून पायी जावे लागत आहे. बंधारा गावापर्यंत पोहचण्यासाठी येथील नागरिकांना अनेक ठिकाणी बोरवान नदी पार करावी लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच मोठं-मोठे दगड, गोटे, खड्डे पार करतांना अनेकांचा पाय घसरून दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनवेळी शासनाकडून मिळणाऱ्या 5 किलो धान्य घेण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपल्या डोक्यावर धान्य ठेवून प्रवास करीत होता. काही तास पायी प्रवास करून दमल्याने त्याच धान्याच्या गोणीवर विसावा घेताना नागरिक दिसून येतात. विसावा घेतल्यानंतर पुन्हा पुढील अंतर कापण्यासाठी त्याच शक्तीने प्रवास करतांना कुटुंबास मोठी कसरत करावी लागत आहे. आमचे व आमच्या कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य असेच जाणार की काय अशी भीती त्यांना नेहमी सतावत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
     धान्य आणण्यासाठी दऱ्याखोऱ्यातून पायी चालत असतांना अनेक वेळा नागरिकांचा अपघात सुद्धा झाला आहे. अनेक वेळा पायांना जखमा होऊन घरगुती उपचार करून तसाच प्रवास करीत धान्य आणत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अशा वेळी रेशनकार्ड धारकांना पॉस मशीनचा अंगठा देण्यासाठी वृद्ध ग्रामस्थांना सुद्धा पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थांतुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे कोरोना महामारीत जनता होरपळली जात असतांना रेशनिंगसाठी दहा ते पंधरा कीलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
    गेल्या 74 वर्षीच्या काळात अनेक आमदार, खासदार व अधिकारी जिल्ह्याला लाभले, परंतु अद्यापही अनेक गाव-पाडे मूलभूत सुविधांपासून लांबच आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ग्रामस्थांना होणारा त्रास कमी करावा. तसेच त्यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी बेडवाई येथील ग्रामस्थांनी केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

बैल विकण्याच्या वादातून लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून , प्रेताची लावली विल्हेवाट, एकास अटक

Next Post

भाजपा युवा मोर्चातर्फे अपघातात मृत्यू पावलेल्या युवा मोर्चाच्या 2 पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

Next Post
भाजपा युवा मोर्चातर्फे अपघातात मृत्यू पावलेल्या युवा मोर्चाच्या 2 पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

भाजपा युवा मोर्चातर्फे अपघातात मृत्यू पावलेल्या युवा मोर्चाच्या 2 पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add