Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्रात संपूर्ण ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गान अनिवार्य करा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Mahesh Patil by Mahesh Patil
January 29, 2025
in राजकीय
0
महाराष्ट्रात संपूर्ण ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गान अनिवार्य करा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी-

 

राष्ट्रभक्तीचे स्फूर्ल्लिंग वंदे मातरम या गीताने होते, वंदे मातरम हे राष्ट्रगान महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला म्हणता येणे आणि त्याचा अर्थ कळणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने वंदे मातरम हे राष्ट्रगान शाळा- महाविद्यालय, शैक्षणिक संस्था याठिकाणी दररोज राष्ट्र गीता सोबत तर शासकीय- निम शासकीय कार्यालय येथे स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, महाराष्ट्र दिनी यादिवशी गाणे अनिवार्य करावे अश्या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत तर आमदार डॉ विजयकुमार गावित यांना समक्ष भेटून दिले.

 

 

यावेळी आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत बंधनकारक होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

 

 

 

निवेदनात म्हटले आहे की, इ.स.१८७० मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले. १८९६ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात  रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम राजकीय संदर्भात गायलेल्या या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारक हे वंदे मातरमचा घोषणा देत हुतात्मा झाले. २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने “वंदे मातरम” हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले.याप्रसंगी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणाले की, ” जन गण मन ” या भारताच्या राष्ट्रगीताच्या बरोबरीने या गाण्याचा देखील सन्मान केला पाहिजे.

 

 

 

 

आजही राष्ट्रभक्तीचे स्फूर्ल्लिंग वंदे मातरम या गीताने होते, वंदे मातरम हे राष्ट्रगान महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला म्हणता येणे आणि त्याचा अर्थ कळणे गरजेचे आहे यासाठी ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गान शाळा, महाविद्यालयात, शासकीय- निमशासकीय कार्यालये यांना बंधनकारक करावे अशी जनभावना आहे, जनभावनेचा आदर राखत महाराष्ट्र शासनाने वंदे मातरम हे राष्ट्रगान शाळा- महाविद्यालय, शैक्षणिक संस्था याठिकाणी दररोज राष्ट्र गीता सोबत तर शासकीय- निम शासकीय कार्यालय येथे स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, महाराष्ट्र दिनी यादिवशी गाणे अनिवार्य करावे असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, प्रविण नांदेडकर, संदीप राजपूत, पंकज डाबी, गणेश राजपूत, पंकज मुसळे आदीं उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात सिकलसेल तपासणी मोहीमेची पालमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात, 8 लाख नागरिकांची तपासणी होणार

Next Post

वाघाळे येथे स्वास्थ्य सहेली उपक्रमाअंतर्गत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार

Next Post
वाघाळे येथे स्वास्थ्य सहेली उपक्रमाअंतर्गत  स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार

वाघाळे येथे स्वास्थ्य सहेली उपक्रमाअंतर्गत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group