देशातील व राज्यातील वाढत जाणाऱ्या कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येवर नियंत्रण आणण्याकरिता व कोवीड १ ९ चा संसर्ग पसरु नये यासाठी महाराष्ट्र शासनाने नवरात्र उत्सव कशा प्रकारे साजरा करावा याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत . सदर परिपत्रकान्वये नवरात्र उत्सवाच्या कालावधीत शासनाने निबंध लादले आहेत . या अनुषंगाने ” नेताजी सुभाषबाबू युवक मंडळ ” , नंदुरबार यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्र देऊन कळविले आहे की , कोविड -१ ९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेवून जिल्हावासियांचे आरोग्याच्या दृष्टीने आणि हिताच्या दृष्टीने सालाबाप्रमाणे ” विजया दशमी ( दसरा ) च्या दिवशी होणारा रावण दहनाचा कार्यक्रम ” मागील वर्षी प्रमाणे यंदाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . नेताजी सुभाषबाबू युवक मंडळ ” , नंदुरबार यांच्या उपरोक्त निर्णयाबद्दल नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या या सामाजिक जाणीवेबद्दल आभार व्यक्त केले आहेत .








