नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील उमर्दे येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गुलाब मराठे याचे सुरू असलेले उपोषण नारळपाणी देऊन रात्री 9.30 वाजेला मागे घेण्यात आले.
राज्यात मराठा आरक्षणाच्या (मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच तापले असून आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषण करत होते. आज २ नोव्हेंबर रोजी त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस होता.

आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यात अखेर शिष्टमंडळाला यश आले आहे.त्यांनी उपोषण सोडल्याने गेल्या 9 दिवसांपासून नंदूरबार तालुक्यातील उमर्दे येथे गुलाब मराठे याचे सुरू असलेले उपोषण पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन सोडवण्यात आले.यावेळी विविध नितीन जगताप, नवनीत शिंदे, रमेश कुटे, प्रा.कृष्णा मराठे, पंकज पायमुडे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








