Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सरकारकडून जनतेला योजनांच्या माध्यमातून भूलथापा : प्रा.शरद पाटील

team by team
October 15, 2023
in राजकीय
0
सरकारकडून जनतेला योजनांच्या माध्यमातून भूलथापा : प्रा.शरद पाटील

नंदूरबार l प्रतिनिधी

 

केंद्र व राज्यातील सरकार बोल घेवड्या योजना घेवून जनतेला भूलथापा देवून दिशाभूल करीत आहेत. अच्छे दिनचे स्वप्न गोरगरीबांना दाखवून सत्तेवर आल्यावर ते विसरले आहेत. आता राज्य सरकारने सरकारी शाळांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शेतकर्‍यांच्या कापसाला योग्य हमी भाव मिळत नाही. दुष्काळाचे संकट आहे. असे असतांना केवळ योजनांची घोषणा करणार्‍या सरकारकडून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत नाही, असा आरोप उबाठा शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आ.प्रा.शरद पाटील यांनी केला.

 

 

नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे उबाठा शिवसेनेच्यावतीने ‘केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा भांडाफोड करुया, बोल घेवड्या योजनांचा’ या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आ.प्रा.शरद पाटील, आ.आमश्या पाडवी, जिल्हा समन्वयक दीपक गवते, सुनिल सोनार, उपजिल्हा प्रमुख के.टी.गावित, रमेश पाटील, विजय ठाकरे, महानगर प्रमुख पंडीत माळी, कैलास पाटील, छोटू पाटील, प्रमोद पाटील, भक्तवत्सल सोनार, डॉ.हेमंत शर्मा, बापू गिरासे, संजय राजपूत, आनंदा पाटील, गोटू पाटील, चुनीलाल पाटील, दीपक पाटील, राकेश चौधरी, राजू पठाण, योगेश सानप, बाबलू नागरे आदी उपस्थित होते. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या बोल घेवड्या योजनांवर चर्चा झाली.

 

 

 

आ.आमश्या पाडवी म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात १८ मोठी धरणे आहेत. परंतू त्या धरणातील पाण्याचा जिल्ह्याला फायदा होत नाही. तापी-बुराई योजनेसाठी लढा सुरु आहे. परंतू त्याकडे सरकार लक्ष देत नाही. जिल्ह्यातून जाणार्‍या तापी नदीवर बॅरेज असूनही त्या पाण्याचा फायदा जिल्ह्या ऐवजी गुजरात राज्याला होतो हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. जिल्हा समन्वयक ि गवते म्हणाले की, केंद्र व राज्याप्रमाणे आता रनाळे ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे रनाळे गावात गेल्या १०-१५ दिवस उलटूनही ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. तापी नदीतून पाणी कधी येणार. ती योजना कधी पूर्ण होणार हा देखील संशोधनाचा भाग आहे. गेल्या २३ वर्षापासून तापी – बुराई सिंचन योजना रखडली आहे, याची खंत त्यांनी व्यक्त केली

बातमी शेअर करा
Previous Post

आयुष्यमान भारत अंतर्गत पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी

Next Post

आदिवासी क्षेत्रात सिंचन सुविधांचे जाळे निर्माण करणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
आदिवासी क्षेत्रात सिंचन सुविधांचे जाळे निर्माण करणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी क्षेत्रात सिंचन सुविधांचे जाळे निर्माण करणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add