Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे अतिक्रमित फार्म हाऊसचे अतिक्रमण काढा : आ.आमश्या पाडवी

team by team
October 14, 2023
in राजकीय
0
अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणी 27 सप्टेंबर रोजी आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी

 

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदूरबार तालुक्यातील टोकरतलाव येथे तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या संपादित केलेल्या जमिनीवर पाणी क्षेत्रात भराव टाकून अतिक्रमित फार्म हाऊस चे जास्तीचे बांधकाम केले आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल इशारा उबाठा शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.

 

 

 

 

नंदुरबार येथे आमदार आमश्या पाडवी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख के.टी.गावीत, महानगर प्रमुख पंडित माळी आदी उपस्थित होते. यावेळी आमश्या पाडवी म्हणाले की, टोकरतळे ता.जि. नंदुरबार शिवारातील शेत सर्वे क्र. १२८ मधील क्षेत्र १०.११ आर हा सर्वे नंबर तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या मालकीचा आहे. याचा भूसंपादन प्रस्ताव क्र. १५/१९ शासन निवाडा दि. २१/०६/२००१ रोजी घोषित झाला आहे. सदर प्रकरणी शेत सर्वे क्र. १२८ मधील क्षेत्र ९०.९१ आर हे पूर्णतः क्षेत्र संपादित केलेले आहे.

 

 

 

हे संपादन करीत असताना जमिनीचे मालक बटेसिंग कन्हैयालाल रघुवंशी यांना मोबदला १२ लाख ६२ हजार ५८ रुपये अदा करण्यात आले आहे. याठिकाणी जमीन मालक यांचे वारस चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी जमीन परत मिळणेबाबत दि. ११/१२/२०२० रोजी तत्कालीन जलसंपदा मंत्री यांना दिलेल्या निवेदनानुसार झालेल्या चौकशीत रघुवंशी यांचे सुमारे २-३ एकरमध्ये अतिक्रमित वास्तू (फार्म हाउस) अस्तित्वात असलेबाबत जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकारी यांनी खात्री केलेली आहे. सदरची वस्तू ही पाणी क्षेत्रात भराव टाकून पूर्ण संचय पातळी (२३९,३० मी) पेक्षा जास्त उंचीवर बांधकाम केले असल्याची खात्री विभागाने केलेली आहे.

 

 

 

सदर प्रकरणी मुळ मालक यांचे वारस चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी नियमित दिवाणी न्यायालयात देखील दाद मागितली होती, परंतु न्यायालयाने सदर दावा दि. ०८/०७/२०१३ च्या निर्णयानुसार आदेश दावा खर्चासह नामंजूर करण्यात आला आहे. परंतु, अद्याप त्यांनी सदरच्या जमिनीवरचा ताबा सोडला नसल्याने त्याठिकाणी चंद्रकांत रघुवंशी यांचे अतिक्रमन असल्याचे एकंदरीत पुराव्यानिशी स्पष्ट झाले आहे. असे असतांना देखील शासनाने २०१३ पासून अद्याप सदरची जमीन ताब्यात घेतली नसल्याने दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी यांच्यावर देखील फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे, असे आ.आमश्या पाडवी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

क्षणोक्षणी एकच ध्यास, आदिवासी बांधवांचा विकास, मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा व्हिडिओ व्हायरल

Next Post

आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी सर्वांचा समन्वय महत्त्वाचा : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

Next Post
आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी सर्वांचा समन्वय महत्त्वाचा : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी सर्वांचा समन्वय महत्त्वाचा : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add