नंदुरबार l प्रतिनिधी
जैन समाज अहिंसक आणि सहिष्णू आहे. असा आपल्या समाजाचे धर्मगुरू आचार्य श्री कमकुमार नंदी महाराज यांचा त्यांची निर्घृण हत्या केल्यानंतर त्यांच्या शरीराचे अनेक तुकडे करणे जैन समाजासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. संपूर्ण जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या धर्मगुरूची निर्घृण हत्या करून, राक्षसी प्रवृत्तीला बळी पडणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करून न्याय्य शिक्षा द्यावी.
यासंदर्भात नंदुरबार येथील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सकल जैन समाज, श्री दिगंबर जैन समाज, श्री श्वेतांबर मूर्ती पूजक संघ, श्री स्थानकवासी श्वेतांबर जैन संघ, श्री तेरापंथी जैन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने निवेदन देण्यात आले.निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे व पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, याबाबत सखोल कायदेशीर दक्षतेने कारवाई करावी. जैन समाज हा अल्पसंख्याक आणि अहिंसक समाज आहे, त्यामुळे आमचे संपूर्ण संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. आपल्या अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांवर बेकायदेशीरपणे कब्जा करून, आपल्या तीर्थंकरांच्या मूर्तींची तोडफोड, आपल्या धर्मगुरूंना शिवीगाळ, शिवीगाळ.धर्मगुरूंवर हल्ले करून त्यांना मारणे अशा अनेक चुकीच्या प्रवृत्ती आता देशात घडत आहेत. याबाबत भारत सरकारचे गृहमंत्री या नात्याने तुम्ही योग्य ती दखल घ्यावी.
अशा घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्या. अल्पसंख्याक अहिंसक समाजाला सुरक्षा प्रदान करावी ही नम्र विनंती. या संदर्भातले निवेदन गृहमंत्री अमित शाह यांना पाठविण्यात आले आहे. या मागणी संदर्भात जैन समाजातर्फे मोर्चा काढण्यात येणार होता मात्र जमावबंदी आदेश लागू असल्याने मोर्चा न काढता निवेदन देण्यात आले.निवेदनावर सुरेश जैन, पदम जैन, भावेश जैन, प्रकाश कोचर, राजेंद्र चोपडा, प्रदीप जैन, जेठमल अंबानी यांच्या सह्या आहेत.








