Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अपघात रोखण्यासाठी शालेयस्तरावर जनजागृती करावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Mahesh Patil by Mahesh Patil
June 9, 2023
in राज्य
0
अपघात रोखण्यासाठी शालेयस्तरावर जनजागृती करावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार l प्रतिनिधी
रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षितता नियमाची शालेयस्तरावरच जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात  जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व जनआक्रोश, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यशाळेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता गणपत गावित, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी, जनआक्रोश संस्थेचे रविंद्र कासलेकर, अजय परमार, प्रकाश खांडेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रत्येकांने स्वंयप्रेरणेने रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. बहुताश अपघातात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक असते, अशा अपघातात त्यांना डोक्याला मार लागुन होणाऱ्या मृत्युंची संख्या जास्त आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर प्रत्येकांने करणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात वाहन चालवितांना अनेक जण निष्काळजीपणे वाहन चालवून स्वत:चा व अन्य व्यक्तिंचा जीव धोक्यात घालत असतात. त्यामुळे असे अपघात भविष्यात होऊ नये यासाठी शालेयस्तरावर रस्ता सुरक्षा नियमांची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. यासाठी सर्व विभागासह विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. जनआक्रोश, नागपूर ही संस्था रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन करत असून त्यांच्या या संस्थेत सर्व नागरिकांनी स्वंयस्फुर्तीने सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री.कासलेकर म्हणाले की,  80 टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याने हे अपघात कमी करण्यासाठी नागरीकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. कुठलीही दुर्घटना ही विदारक असते, ती टाळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगून जनआक्रोश संस्थेचा प्रमुख उद्देश हा नागरीकांचे प्रबोधन करणे असल्याचे सांगितले. अजय परमान यांनी नागरीकांनी दूचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करावा, वाहन चालवितांना सिट ब्लेटचा वापर करावा. वाहन ओव्हरटेक करु नये, वाहन चालविताना प्रत्येकाने स्वत:बरोबर इतरांचाही आयुष्यांचा विचार करावा असे त्यांनी सांगितले. प्रकाश खांडेकर यांनी वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी, वाहतुकीचे नियम पालन, रस्ता सुरक्षा संदर्भात पीपीटीद्वारे सादरीकरण केले. या कार्यशाळेस मोठया संख्येने नागरिक व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

युपीएससी परीक्षेमध्ये यश मिळविणाऱ्या जैनम जैन यांचा नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सत्कार

Next Post

सैन्य भरतीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे

Next Post
सैन्य भरतीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे

सैन्य भरतीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदनगरीत १२ फूट विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, हजारोंची उपस्थिती

नंदनगरीत १२ फूट विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, हजारोंची उपस्थिती

July 7, 2025
महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हे, स्वार्थासाठी एकत्र येण्याचा कांगावा

महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हे, स्वार्थासाठी एकत्र येण्याचा कांगावा

July 7, 2025
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा

July 7, 2025
आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group