म्हसावद l प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त १ एप्रिल ते १ में दरम्यान सामाजिक समता पर्व अभियान राबवीण्यात येत आहे.
यानिमित्त युवकमित्र परिवार नंदूरबार या संस्थेमार्फ़त ‘जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खुल्या गटात निबंध स्पर्धेचे आयोजन केले असून नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेबांचे जलनीतीविषयक विचार आणि आज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर-परिवर्तनाचे अग्रदूत,डॉ.बाबासाहेब आंबेडकर- आपले आदर्श आपले प्रेरणास्थान,क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि त्यांचे कृषिविषयक विचार,महात्मा फुलेंचे सत्यशोधक विचार- काळाची गरज,महात्मा फुलें- आजच्या समाज सुधारकांचे प्रेरणास्थान या विषयांवर स्पर्धकांनी कागदाच्या एका बाजूला सुवाच्छ अक्षरात, किमान ३००० शब्दात निबंध लिहून/टाइपिंग करून त्याची पीडीएफ दि.२५ एप्रिल २०२३ पर्यंत व्हाट्स अप क्रमांक 9529125396 वर पाठवावी.
उत्कृष्ट प्रथम,द्वितीय, तृतीय पारितोषीक ११०१,७०१,५०१ रु.रोख व सन्मानचिन्ह,पुस्तके या स्वरूपात पारितोषिके देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट निबंध लिहणाऱ्या प्रथम तीन स्पर्धकांना शहादा येथे आयोजित विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार असून संशोधनपर,अभ्यासपूर्ण व वैचारिक,संदर्भीय आधारावर लिखाणास प्राधान्य देण्यात येईल. तसेच पारितोषिके निवडी संदर्भात परीक्षक समितीचा निर्णय अंतिम राहील.सर्वच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकामार्फत करण्यात येत आहे.









