Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भादवड येथे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

team by team
September 11, 2022
in राष्ट्रीय
0
भादवड येथे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ
नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला. शुभारंभासाठी संपूर्ण भारतातील 75 आरोग्यवर्धिनी केंद्रांची निवड करण्यात आलेली होती, त्यात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भादवड या आरोग्यवर्धिनी केंद्राची निवड करण्यात आलेली होती.
 जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. हर्षद लांडे जागतिक आरोग्य संघटना सल्लागार, डॉ. मनीषा वळवी  तालुका वैद्यकीय अधिकारी नवापूर, डॉ. योगेश वळवी वैद्यकीय अधिकारी पळसून, डॉ. सखाराम  वळवी  वैद्यकीय अधिकारी पळसून, डॉ. तुषार वसावे  समुदाय आरोग्य अधिकारी यांनी भादवड येथे प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले.
यावेळी खांडबारा येथील याहा मोगी मेडिकलच्या संचालिका दिपाली गावित व अविनाश गावित यांनी निक्षय मित्र उपक्रमांतर्गत परिसरातील पाच क्षयरुग्णांना त्यांच्याकडून पोषण आहाराचे वाटप केले यामध्ये प्रत्येक क्षयरुग्णाला दरमहा ३ किलो तांदूळ, ३ किलो गहू, १ किलो शेंगदाणे, १ लिटर खाद्य तेल, १ किलो गुळ, अर्धा किलो तुवर डाळ, अर्धा किलो मुग डाळ, अर्धा किलो मसुर डाळ देण्यात येणार आहे.
  संसर्गजन्य आजारामुळे होणाऱ्या मृत्युमध्ये क्षयरोगाचा समावेश प्रमुख १० आजारांमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये व भारतामध्ये क्षयरोग आजाराचे व क्षयरोगामुळे होणा-या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार केला आहे. भारताने सन २०२५ पर्यंत क्षयरोगाचे दुरीकरण करण्याचे धोरण निश्चित केले आहे.
ज्या व्यक्तीचा आहार पोषक नाही अशा व्यक्तीमध्ये क्षयरोग होण्याचे प्रमाण अधिक असते तसेच ज्या व्यक्तींना क्षयरोग झाला आहे अशा व्यक्तींना उपचार कालावधीत पोषण आहार मिळाला नाही तर त्यांना उपचार मिळुनही उपचाराचे सकारात्मक परिणाम दिसुन येतातच असे नाही.
यामुळे क्षयरुग्णांमध्ये पोषक आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या सर्व बाबींचा विचार करता केंद्र शासनाने प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान (PMTMBA) सुरु केला आहे. या मध्ये विविध देणगीदार (व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सहकार सेवा, विविध संस्था, निवडुन आलेले लोकप्रतिनिधी इ.) ज्यांना निक्षय मित्र असे संबोधण्यात येते. त्यांच्या मार्फत क्षयरुग्णांना १ ते ३ वर्षासाठी कोरडा आहार पुरविण्यात येऊ शकतो.
जिल्हयातील ज्या क्षयरुग्णांनी आहारासाठी संमती दिली आहे त्यांना आहार पुरवठा करायचा आहे. संमती दिलेल्या क्षयरुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. संमती दिलेल्या क्षयरुग्णांना निक्क्षय मित्राच्या सहाय्याने पोषण आहार पुरविणे शक्य होईल.
बातमी शेअर करा
Previous Post

लक्झरी बसचा भीषण अपघात, चालक व 18 महिन्याच्या मुलीचा मृत्यू, ३० प्रवासी गंभीर जखमी

Next Post

दुचाकीच्या वाहनाच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू

Next Post
विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एकावर धारदार शस्त्रांने हल्ला, तीन जण जखमी दंगलीचा गुन्हा दाखल

दुचाकीच्या वाहनाच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

January 25, 2026
श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

January 25, 2026
रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

January 25, 2026
राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

January 25, 2026
चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

January 25, 2026
नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

January 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add