नंदुरबार l प्रतिनिधी
नर्मदा घाटीत अतिमुसळधार पाऊस झाल्याने दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने नर्मदा काठावरील अनेक गावांचा संपर्क तूटला आहे.

नर्मदा काठावरील महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम चिमलखेडी सह नर्मदा काठावरील गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अतीमुसळधार पावसात दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने चिमलखेडी, पिंपळखुटा, जांगठी, सिंदुरी, गमन सह अनेक आदिवासी पाड्यांवर दळणवळणाची सोय बंद झाल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.
डोंगरदऱ्यातील रस्त्यांमुळे येथील नागरिकांना मदतीसाठी प्रशासनही हतबल आहे. नर्मदा घाटी सह नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आज सकाळपासूनच पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने दिलासा मिळणार आहे, तसेच शेती कामांना वेग येणार आहे.








