नंदूरबार l प्रतिनिधी
चाळीस वर्षानंतर पूर्ण झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील देहली प्रकल्प जवळील गाव खेड्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी. देहली प्रकल्पात पहिल्याच पावसात अंबाबारी गांव पाण्याखाली गेले आहे, तर दसरापादर गावात ही पाणी शिरल्याने प्रशासनाचे पुनर्वसनाचे दावे फोल ठरले आहेत.

अक्कलकुवा तालुक्यातील देहली मध्यम प्रकल्पाचे काम जवळपास 40 वर्षानंतर पूर्ण झाले आहे, यंदा पहिल्याच वर्षी गळाभरणीचे काम पूर्ण करून पाण्याची अडवणूक केली आहे. देहली मध्यम प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत 24 तासात वाढ झाली असून
सद्यस्थितीत पाणीपातळी 189.60 मीटरची नोंद झाली आहे. प्रकल्पाची महत्तम पूर पातळी 200.50 मीटर असून हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने देहली नदीकाठावरील डाव्यातीरातील रायसिंगपूर,
पुर्नवसन आंबाबारी, जुना नांगरमुथा, नवा नांगरमुथा, घोटपाडा, कोराई, खापर तर उजव्या तीरावरील रांझणी, घुनसी, लालपुरा, वल्ली, कोराई तसेच उखळसाग, भोयरा, सोनपाटी, कोयलीविहिर, खटकुवा, पोहरा, गंगापुर, घंटाणी, वाकाधामन, अंकुशविहीर, कंकाळी या कालव्यावरील गावातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
चाळीस वर्षानंतर पूर्ण झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील देहली प्रकल्प जवळील गाव खेड्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी. देहली प्रकल्पात पहिल्याच पावसात अंबाबारी गांव पाण्याखाली गेले आहे, तर दसरापादर गावात ही पाणी शिरल्याने प्रशासनाचे पुनर्वसनाचे दावे फोल ठरले आहेत.
आज सकाळपासूनच अतिरिक्त जिल्हाधिकारी मैयंक घोष यांनी देहली प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली आहे. धरण परिसरातील नागरिकांना असुरक्षितता वाटत असल्याने सामाजिक कार्यकर्ते नागेश पाडवी यांनीही देहली प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली आहे.
देहली काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.








