नंदुरबार l प्रतिनिधी
व्हाट्सअप स्टेटस ठेवण्याच्या वादातून शेकडोंच्या संख्येने असलेल्या एका समूहातील समाजकंटकांनी अक्कलकुवा शहरात 10 जून रोजी मध्यरात्री तुफान दगडफेक करून अक्कलकुवा शहरात दुचाकी चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीची धरपकड सुरू केली आहे.
अक्कलकुवा शहरात नागरिकांनी घटनेचा निषेध नोंदवत स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला आहे.
दरम्यान इतर संशयित मुख्य आरोपींना अद्याप पर्यंत अटक केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून नागरिकांनी शहरात 11 जून पासून सलग दुसऱ्या दिवशीही 12 जून रोजी ही कडकडीत बंद पाळला आहे.
जो पर्यंत मुख्य गुन्हा घडवून आणणारे आरोपीं वर कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत गाव बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अक्कलकुवा पोलिस स्टेशन येथे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांना निवेदन सादर करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या वेळी आ.राजेश पाडवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी आदी उपस्थित होते.