Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचा गलथान कारभार, रावसाहेब नेहमीच राहतात “कवरेज क्षेत्राच्या बाहेर”

Mahesh Patil by Mahesh Patil
June 3, 2022
in सामाजिक
0
अक्कलकुवा सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचा गलथान कारभार, रावसाहेब नेहमीच राहतात “कवरेज क्षेत्राच्या बाहेर”

खापर l वार्ताहर
अक्कलकुवा तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे गलथान कारभार असल्याचे नेहमी निदर्शनास येते.या विभागाचे अभियंता अक्कलकुवा येथील कार्यालयात नसून तर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय शहादा येथूनच काम बघतात.

त्यामुळे येथील कार्यलयातील ‘खुर्ची नेहमीच खालीच’ दिसते. संबंधित कामासाठी आलेल्या लोकांना येथील कर्मचाऱ्यांकडून “साहेब शहाद्याला आहेत” असे उत्तर मिळते.त्यामुळे काही काम असल्यास फोनवर संपर्क साधावा लागतो.अभियंता कुणाल पटले यांच्या या कारभाराला तालुक्यातील लोक कंटाळले असल्याचे सांगितले जात आहे.

सद्या बदल्यांचे शिबिर सुरू आहे त्यामुळे आता येथील अभियंतांची बदली होऊन इतर कोणी येत की मग अक्कलकुवा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची परिस्थिती “जैसे थे” राहील याकडे तालुक्याचे लक्ष लागुण आहे.

अक्कलकुवा तालुक्याची तळोदा ते गुजरात राज्यच्या हद्दीपर्यंत नेत्रंग-शेवाळी महामार्गावर येणाऱ्या प्रत्येक पुलावरती कठड्याची आवश्यकता आहे.जुन्या पुलांवरती निकृष्ट दर्जाचे थातुरमातुर काम झालेले असल्यामुळे ते कठडे लवकर तुटतात. व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर विभागाअंतर्गत होणाऱ्या रस्त्यांची परिस्थिती पण तशीच आहे. वर्षपूर्ती होण्यापूर्वीच रस्त्यांना खड्डे पडायला सुरुवात होते.अक्कलकुवा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता त्यांचे काम उपविभागीय कार्यालय शहादा येथुन बघत असल्याने कार्यालयांतर्गत होणारे काम हे राम भरोसेच असल्याचे समजते.गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील कामे अश्याच पध्दतीने सुरू असल्याने तालुक्याचा विकासाला आळा बसत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

 

विश्रामगृहाचा सार्वजनिक मुतारी म्हणून होतोय वापर

खापर येथील शासकीय विश्राम गृह गेल्या काही वर्षांपासून निकामी.अक्कलकुवा तालुक्यातील खापर हे गाव नेत्रंग शेवाळी महामार्गालगत आहे.दशकांपूर्वी येथील शासकीय विश्राम गृह आकर्षणाचे केंद्र होते.

विश्राम गृहाच्या परिसरात असलेली झाडांची हिरवळ मन मोहणारी होती.कालांतराने संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने विश्राम गृहाची दुरावस्था झाली आहे.प्रवेशद्वार तुटले आहे.

आत असलेले पलंग,कपाट,दरवाजे, खिडक्या देखील पावसाळ्यातील पाण्यामुळे खराब झाले आहेत.परिसरातील दुकानदार विश्रामगृहाच्या प्रागणाला सार्वजनिक मुतारी म्हणून वापरात घेत आहे.विभागाने सदर विषयांची दखल घेऊन विश्रामगृहांचे संवर्धनाची कामे करावी जेणे करून ते वापरात येईल.

बातमी शेअर करा
Previous Post

शासकीय निवासी शाळेत सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

Next Post

बालिका आश्रमातुन २ अल्पवयीन मुलींचे अपहरण

Next Post
जिल्ह्यातून तिघा अल्पवयीन मुलींचे अपहरण

बालिका आश्रमातुन २ अल्पवयीन मुलींचे अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025
बनारस येथे शिकणाऱ्या धडगाव तालुक्यातील युवकाविरुद्ध प्रक्षोभक व्हिडिओ तयार केल्याप्रमाणे गुन्हा दाखल

बनारस येथे शिकणाऱ्या धडगाव तालुक्यातील युवकाविरुद्ध प्रक्षोभक व्हिडिओ तयार केल्याप्रमाणे गुन्हा दाखल

October 20, 2025
अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

October 20, 2025
‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group