नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील शेल्टी गावात शेती पाहण्याच्या कारणावरुन वाद झाल्याने चौघांना मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील शेल्टी येथील वसंत धोंडू कोळी व त्यांचे मोठे भाऊ, पत्नी व मुलगा असे तिघेजण शेती पाहण्यासाठी गेले होते. या कारणावरुन वाद झाल्याने चौघांना आनंदा धोंडू कोळी, राकेश आनंदा कोळी, राहूल आनंदा कोळी (चौघे रा.शेल्टी शहादा) व समाधान भगवान कोळी (रा.पिंप्री ता.शहादा) यांनी लाठ्या-काठ्या व कोयत्याने मारहाण केली. तसेच पुन्हा शेतात पाय ठेवलास तर जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत वसंत कोळी यांच्या फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध
भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ३२४, ३२५, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.प्रकाश चौधरी करीत आहेत.