नंदूरबार l प्रतिनिधी
पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने विद्युत पुरवठा विनाकारण बंद करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन अल्पसंख्यांक विकास आणि हक फाऊंडेशनच्यावतीने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय.नेते व माजी.मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या आदेशानुसार व प्रदेश अध्यक्ष यांचा सांगता वरून.
मुस्लिम धर्मा चा पवित्र महीना रमज़ान सुरू होत आहे. ३ एप्रिल ते ३ मे दरम्यान ऊन जास्त असल्याने या काळात विद्युत पुरवठा विनाकारण बंद करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन देण्यात आला. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही रमजान महिना उन्हाळ्यात येत आहे या करीता लोकांना होणारा त्रास पाहता, विद्युत विभागाचे श्री. बोरसे यांनाही अल्पसंख्यांक विकास आणि हक फाऊंडेशन तर्फे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आकीब धोबी, डॉ.मतीन शेख, सगीर मन्सूरी, मोईनुद्दीन काझी, तनवीर शेख आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.








