म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सुसरी धरण वळण रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार अपघात होत असल्याने भाजपा किसान प्रदेश सदस्य डॉ.किशोर पाटील यांनी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांना रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेत तहसीलदार यांनी संबंधित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने भाजपा किसान मोर्चा तसेच शेतकऱ्यांमार्फत गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवीला होता याची दखल घेत संबंधित विभागाने तात्काळ रस्ता दुरुस्ती ला सुरुवात करण्यात आल्याने आंदोलनाला यश आले.
सविस्तर वृत्त असे की,शहादा-खेतीया या मार्गावरील सुसरी धरण वळण रस्त्यावर गेल्या चार वर्षापासून काम सुरू आहे त्यात काही पूर्ण देखील झाला आहे त्यात वळण रस्त्यावर एक ते दीड किलोमीटर अंतराचे काम अपूर्णावस्थेत असल्याने दैनंदिन अपघात घडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेत मालाचे नुकसान होऊन रोज उसाची ट्राली, कापूस आदी पिकांचे नुकसान होत आहे.तरी संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून तरी या अपघातात जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? अधिकारी का ठेकेदार की प्रतिनिधी तरी आपल्या स्तरावरून तात्काळ संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन काम त्वरित सुरू करावे जर काम त्वरित सुरू झाले नाही तर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येइल याला जबाबदार प्रशासन राहील असे निवेदन तहसीलदार डॉ.मिलींद कुलकर्णी यांना देण्यात आले होते. याची दखल तहसीलदार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या परंतु आजपर्यंत संबंधित विभागाने रस्ता दुरुस्ती न केल्याने अपघात रोज घडत असून याकडे दुर्लक्ष झाल्याने भाजप किसान प्रदेश सदस्य डॉ.किशोर पाटील तसेच शेतकऱ्यांमार्फत सुसरी धरण वळण रस्ता दुरुस्ती साठी ३ मार्च सकाळी१० वाजेला रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष छोटूलाल पाटील, दिनेश खंडेलवाल, विनोद जैन ,काशिनाथ सोनार,कपिल जैस्वाल, डॉ.अजित पाटील, रमाशंकर माळी,डिंगबर पाटील,अनिल पाटील,दुर्गेश पाटील,मनीष पाटील, माधव पाटील,रमाकांत पाटील,संतोष फकीरा पाटील,भानूदास पाटील,डॉ.हर्षल पाटील, हिरालाल मोरे, जगन्नाथ पाटील, प्रमोद पाटील, प्रदीप पाटील, अश्विन पाटील,निंबा पाटील,भगवान पाटील, राजेंद्र राजपूत,आनंद पाटील, गोपाळ पाटील,गोकुळ पाटील,सुनील पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.