Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस दलातील महिला सहायता कक्षाला 148 जोडप्यांचे संसार पुन्हा जुळवण्यात आले यश

Mahesh Patil by Mahesh Patil
February 21, 2022
in क्राईम
0
पोलीस दलातील महिला सहायता कक्षाला 148 जोडप्यांचे संसार पुन्हा जुळवण्यात आले यश

नंदूरबार l प्रतिनिधी
पुरुषांकडुन महिलांवर होणाऱ्या मानसिक व शारीरीक त्रासामुळे तसेच कौटुंबिक कलहामध्ये समुपदेशनाद्वारे संसार जोडण्याचे काम नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे महिला सहाय्यता कक्ष करत आहे . या अंतर्गत सन 2021 मध्ये महिला सहायता कक्षाकडे महिलांच्या अत्याचाराबाबत 352 अर्ज केले होते . त्यापैकी 148 कौटुंबिक कलह सामोपचाराने तसेच समुपदेशनाने मिटवून त्यांचे संसार सुरळीत व सुव्यवस्थीत सुरु करण्याचे काम महिला सहाय्यता कक्षाने केले आहे .
महिलांवरील अन्याय आणि विशेषतः कौटुंबिक कलह निर्मूलनासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस मुख्यालयांतर्गत असे महिला कक्ष कार्यरत आहे . त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातही पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सहाय्यता कक्ष कार्यरत आहे . कक्षातील अधिकारी व अमंलदार हे तक्रारदार महिला व तिचे सासरकडील कुटुंब अशा दोघांचे समुपदेशन करुन त्यांचा संसार सुरळीतपणे चालविण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल असतात . विशेषत : लॉकडाऊनमध्ये तसेच बेरोजगारीमुळे घरात असल्याने व आर्थिक कारणांनी काही घरात पती- पत्नी , सासु – सुन , मुलगा- वडील अशा अनेक नात्यांमध्ये तक्रारी व भांडणे होवु लागली त्यामुळे कौटुंबिक कलह मोठया प्रमाणात वाढले होते . कोविडच्या दुसऱ्या व तिस – या लाटेमुळे घरातील कौंटुंबिक कलह अजुन मोठ्या प्रमाणात सुरु झाले . सन 2021 या वर्षात कौटूंबीक कलहाच्या अशा सुमारे 352 तक्रारी पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत महिला सहायता कक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या . यामध्ये प्रामुख्याने पती व पत्नी यांचे विवाहबाह्य संबंध , सासु – सुनेचे कौटूंबीक वाद , तसेच पतीने किंवा पत्नीने एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेणे अशा विविध तक्रारींचा समावेश होता . महिला सहायता प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जांपैकी जास्तीत जास्त तक्रार अर्ज हे मध्यमवर्गीय कुटूंबातील आहेत . उच्च शिक्षीत पती – पत्नी तसेच नोकरदार पती – पत्नी व एकत्र कुटूंबातील तक्रारदारांचा महिला सहायता कक्षाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा समावेश आहे . तर मध्यमवर्गीय व कमी उत्पन्न घटकातील
महिलांच्या तक्रारींमध्ये समजोता होवून संसार जुळवून येण्याच्या प्रमाणात वाढ आहे . त्या तुलनेत उच्च शिक्षीत पती – पत्नींचे संसार जुळवून येण्याचे प्रमाण कमी आहे . सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येकाकडे असलेल्या स्मार्ट फोनमध्ये असलेल्या व्हॉट्सॲप , फेसबुकमुळे व इतर समाज माध्यमांमुळे पती – पत्नीच्या संशयी वृत्तीत वाढ झाली असून त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होवून अशा काळात पत्नीने रागात माहेरी निघून गेल्यामुळे निर्माण झालेल्या गैरसमजातून कौटूंबीक कलह वाढीस लागले होते . अशा कौटूंबीक कलहामुळे वेगळ्या झालेल्या दाम्पत्यांच्या आयुष्यात महिला सहायता कक्षाकडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी समुपदेशनाच्या माध्यमातून गैर समज दूर करून त्यांच्या तुटलेल्या कौटूंबीक गाठी पुन्हा जुळवून आणण्याचे काम केले आहे . तक्रारदार महिलेचा अर्ज महिला सहायता कक्षाकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांना 3 ते 4 वेळा समुपदेशनासाठी महिला कक्ष येथे बोलविले जाते . ज्या प्रकरणांमध्ये पती – पत्नीमध्ये तडजोड शक्य आहे.अशा कुटूंबांना अधिकचा वेळ देवून त्यांच्यात असलेला दुरावा कमी करून त्यांचा संसार सुरुळीत केला जातो . तक्रारदार महिला व त्यांचे कुटुंबीय यांना भविष्यात होणाऱ्या परिणामाची माहिती देवून देखील बाद न मिटल्यास अशा वेळी संबधीत गैरअर्जदार यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतो . कौटुंबिक कलहातून पतीने घराबाहेर काढलेल्या महिलांना कक्षातील अधिकारी व अमंलदार यांनी आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने घरगुती गृह उद्योग सुरु करण्याबाबत मार्गदर्शन केल्याने काही तक्रारदार महिलांना स्वतःचा गृह उद्योग सुरु केला आहे . पिडीत महिलांना तात्काळ पोलीस मदत मिळावी म्हणुन संपूर्ण राज्यात 1091 हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे . सदर कक्षात महिलांविषयक कौटुंबिक तक्रारीचे निवारण करण्यात येते . पतीचे तुटपुंजे आर्थिक उत्पन्न पती – पत्नीमधील किरकोळ वाद , सासु – सुनेचे किरकोळ वाद , मुलांच्या शिक्षणाकडे व संगोपनाकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे निर्माण होणारे वाद यामुळे काटूंबीक कलह निर्माण होत असून संयमी वृत्ती ठेवल्यास यातून मार्ग निघू शकतो व तुटण्यात आलेला संसार पुन्हा फुलू शकतो . पती – पत्नी यांनी समाज माध्यमांचा जबाबदारीने वापर करून मुलांच्या शिक्षणाकडे व संगोपनाकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले . आलेल्या तक्रारी मिटवून पुन्हा सुरळीत संसार व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार व पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यता कक्षाच्या प्रभारी अधिकारी सहा . पोलीस निरीक्षक नयना देवरे , सहा . पो उप निरीक्षक भगवान धात्रक , महिला पोहेकॉ प्रमिला वळवी , महिला पोहेकॉ विजया बोराडे , महिला पोहेको प्रिती गावीत , महिला पो . शि अरुणा मावची हे प्रयत्नशील असतात .

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे न.पा.चे काम सुरू असताना स्लॅब कोसळला, दोन जण थोडक्यात बचावले

Next Post

बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group